*मध्ययुगीन भारत:
• दक्षिण भारतात तुघलकाची सत्ता नष्ट झाल्यावर विजयनगर आणि बहमन ही दोन प्रबळ राज्ये उदयास आली.
*विजयनगरचे राज्य :स्थापना
• तुघलकांची सत्ता कमकुवत झाल्यावर हरिहर व बुक्क या दोन बंधूनी इ. स. 1336 मध्ये कृष्णा व तुंगभद्रा नद्यांच्या प्रदेशात स्वतंत्र राज्य स्थापन केले.
• विजयनगर ही त्यांची राजधानी होती.
• हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा होय.
• इ. स. 1353 मध्ये हरिहरचा मृत्यू झाल्यावर त्याचा भाऊ बुक्क गादीवर बसला.
• बुक्क 1379 मध्ये मरण पावला.
*राज्य विस्तार:
• बुक्कानंतर दुसरा हरिहर सत्तेवर आला. हरिहर, बुक्कप्रमाणेच दुसऱ्या हरिहरच्या काळातही बहमनी सत्तेशी संघर्ष पुढे चालूच राहिला.
• दुसऱ्या हरिहरचा सेनापती गुंड याने कारवार, म्हैसूर, तिरुचिरापल्ली, कांची इत्यादी प्रदेश जिंकून घेतले.
• दुसरा हरिहर 1404 मध्ये मरण पावला.
• इ. स. 1509 मध्ये सत्तेवर आलेल्या कृष्णदेवरायच्या काळात विजयनगरचे साम्राज्य वैभवाच्या शिखरावर पोचले.
• विजयवाडा, राजमहेंद्री हे भाग त्याने आपल्या राज्याला जोडले.
• रायचूर, तेलंगणाचे काही प्रदेश जिंकून घेतले.
• कृष्णदेवरायने ‘आमुक्तमाल्यदा’ हा राजनीतिविषयक तेलुगू ग्रंथ लिहिला.
• डोमिंगो पेस या पोर्तुगीज प्रवाशाने कृष्णदेवरायचे ‘महान न्यायी राज्यकर्ता’ असे वर्णन केले.
• कृष्णदेवरायाचा मृत्यू इ.स. एस.एस.1530 मध्ये झाला.
• कृष्णदेवरायनंतर विजयनगरच्या साम्राज्याला उतरती कळा आली.
• विजयनगरचा राजा रामराया याचा ‘तालिकोट’ येथे इ. स. 1565 मध्ये आदिशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही यांनी एकत्र येऊन पराभव केला.
• त्यानंतर विजयनगरचे राज्य लहान लहान राज्यांत विभागले.
प्रशासन:
विजयनगरच्या राजांची धोरणे जनतेच्या हिताची होती.
• प्रशासनाच्या कामात राजाला मदत करण्यासाठी प्रधानमंडळ असे.
• राज्यकारभाराच्या सोयीसाठी पाडलेल्या प्रांताला ‘मंडलम्’ असे म्हणत.
• प्रत्येक उपविभागाला ‘नाडू’ असे नाव होते. गाव हा सर्वांत छोटा प्रशासकीय घटक होता.
• विजयनगरच्या साम्राज्याला अब्दुल रझाक, नूनीझ, इब्न बतूता इत्यादी परकीय प्रवाशांनी विजयनगरच्या साम्राज्याचे वर्णन केले आहे.
• बहमनी राज्य:स्थापना:
• महंमद तुघलकाच्या कारकिर्दीत दक्षिणेतील काही सरदारांनी बंड केले.
• दौलताबाद हस्तगत करून इ. स. 1347 मध्ये हसन गंगू बहमनशाह याची सुलतान म्हणून नेमणूक केली.
• बहमनशाहाच्या राज्यास ‘बहमनी राज्य’ असे म्हणतात.
*राज्य विस्तार:
• बहमनशाहाने ‘गुलबर्गा’ येथे आपली सत्ता स्थापन केली.
• त्याने बिदर, तेलंगणा, कोल्हापूर, गोवा, दाभोळ इत्यादी प्रदेश जिंकून आपला राज्यविस्तार केला.
• बहमनशाहाच्या काळात ‘गुलबर्गा’ हे विद्येचे माहेरघर मानले जात होते.
•इ.स. 1358 मध्ये बहमन शाह मरण पावला.
• इ. स. 1422 मध्ये अहमदशाह गुलबर्गाचा सुलतान झाला. त्याने आपली राजधानी गुलबर्याहून ‘बिदरला’ हलवली.
• विजयनगरचा राजा दुसरा देवराय याचा त्याने पराभव केला.
• वजीर महमूद गावानने उडीसा, विजयनगर विरुद्ध विजय मिळवला. कोकणातील तिसरा महंमदशाह (इ. स. 1463 ते 1482) याच्या काळात त्याचा अनेक दुर्गम किल्ले जिंकले.
• महमूद गावानने जहागीर देण्याऐवजी सैनिकांना रोख पगार देण्यास सुरुवात
• जमीन महसूलचा दर निश्चित केला.
•प्रांतप्रमुखाच्या मनमानीला आळा घालण्यासाठी आपल्या राज्यात लहान-लहान प्रांत केले.
• गावान विद्याप्रेमी होता. त्याने मदरसा सुरू केली.
• पंधराव्या शतकाच्या अखेरीस बहमनी राज्य मोडकळीस आले.
• बहमनी राज्याच्या विभागणीमुळे वऱ्हाडची इमादशाही, अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही निर्माण झाली.
• पुढे इमादशाही निजामशाहाने व बरीदशाही आदिलशाहाने जिंकली.