Election Commission constitutional powers-मतदार याद्यांचे एस आय आर वैधच: आयोगाचा हा घटनात्मक अधिकार

संपूर्ण देशभर विरोधी पक्षांनी एस आय आर वरून रान उठवले आहे. मतदार यादीतून अनेक मतदारांची नावे वगळलेली आहेत,असा विरोधी पक्षांचा आरोप आहे. सर्वोच्च न्यायालयाने एस आय आर वैधच असल्याचा आणि आयोगाचा हा घटनात्मक अधिकार असल्याचा निर्वाळा दिला आहे. असे असले तरी निवडणूक आयोगाने निष्पक्षपातीपणे एस आय आर करणे आवश्यक आहे. अनेक राजकीय विश्लेषकांचे म्हणणे सुद्धा … Read more

Kolhapur cyber crime news-कोल्हापूरात सायबर गुन्हेगारी वाढली: सुमारे 120 कोटींचा नागरिकांना फटका

संपूर्ण भारतातच सायबर गुन्हेगारी वाढत असून नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत.कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे एकशे कोटींच्या रू.च्यावर सायबर गुन्हेगारांनी नागरिकांच्या पैशावर डल्ला मारला आहे. ऑनलाइन बँकिंग आणि डिजिटल व्यवहार ही सोय झाली असली तरी त्यातून सायबर गुन्हेगारांसाठी पैसे हडपण्याची मोठी संधी निर्माण झाले आहे. त्यामुळे ऑनलाईन खरेदीवर सवलतींचे आमिष देऊन ते डिजिटल अरेस्टची भीती … Read more

US-Iran war flares up again-इराण अमेरिका युद्धाच्या पुन्हा भडका

इराण-अमेरिका संघर्षाच्या 88 व्या दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता करार लवकर होण्याचा दावा केला आहे. मात्र अमेरिकन लष्कराने केलेल्या स्वसंरक्षणात्मक हवाई कारवाईनंतर इराणने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेची भूमिका वाईट हेतू आणि अविश्वासार्हता याचे प्रतीक असल्याचे इराणने म्हटले आहे. कतारची राजधानी दोहा या ठिकाणी इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धबंदीसाठी उच्चस्तरीय राजनैतिक वाटाघाटी सुरू … Read more

HSRP number plate deadline-एच एस आर पी नंबर प्लेट साठी शेवटची घंटा:एक जुलैपासून कारवाई

गेल्या वर्षभर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट अर्थात एच एस आर पी साठी वाहनधारकांना दिलेली मुदत 30 जूनला संपणार आहे.कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही 9 लाख 49 हजार 216 वाहनांपैकी 5 लाख 12 हजार 553 वाहनांनी नंबर प्लेट बसवलेली नाहीत. तर 43 हजार 930 वाहनधारकांनी नोंदणीच केलेली नाही.येत्या 38 दिवसांनी नंबर प्लेट वाहनधारकांना बसवावी लागणार आहे. परिवहन आयुक्त … Read more

8000 villages facing water shortage-महाराष्ट्रात तीव्र पाणीटंचाई: 8000 हून अधिक गावांना पाणीटंचाईच्या झळा

उष्णतेचे वाढते प्रमाण, प्रचंड तापमान,धरणांच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली जात असलेली स्थिती आणि वळीव पावसाचा हूल यामुळे महाराष्ट्रात सुमारे आठ हजारहून अधिक गावांना तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या अधिकृत साप्ताहिक अहवालानुसार महाराष्ट्रातील सुमारे 15 जिल्ह्यांमध्ये 633 गावे आणि 1652 वाड्या-वस्त्या टंचाईग्रस्त घोषित असून तेथे 660 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला … Read more

Iran-US peace deal latest news-इराण-अमेरिका शांतता कराराला ट्रम्प यांचा खोडा: होर्मुझची नाकेबंदी कायम राहणार

इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या शांतता कराराच्या चर्चांना पुन्हा एकदा खीळ बसली असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करार करण्यात कोणतीही घाई करू नका.वेळ आपल्या बाजूने असल्याचे आपल्या प्रतिनिधींना सांगितले. शिवाय जोवर करार होत नाही तोवर होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिकेची नाकेबंदी कायम असेल असा थेट इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. इराणने शांतता करार लवकरच पूर्ण … Read more

Vidarbha Heatwave-विदर्भात उष्णतेची लाट: रेड अलर्ट कायम

2026 हे उच्चांकी तापमानाचे वर्ष आणि उच्चांकी तापमानाचा उन्हाळा मानला पाहिजे. ग्लोबल वॉर्मिंगबरोबरच प्रचंड वृक्षतोड, जंगल नष्ट करण्याची प्रवृत्ती आणि सिमेंटचे रस्ते अशा अनेक कारणांनी भारतासह महाराष्ट्र तापला आहे. विशेषतः विदर्भात प्रचंड उष्णता असून आजही विदर्भात उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट कायम आहे.महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे तापमान थोडे कमी वाटत असले तरी विदर्भ जसाच्या तसा … Read more

El Nino and Agriculture-चालू वर्षीचा खरीप हंगाम अल निनो मुळे धोक्यात

खतांच्या भरमसाठ किमती वाढल्यामुळे अगोदरच शेतकऱ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. खरीप हंगाम करण्यासाठी शेतकऱ्यांना चढ्या दरातील खत घ्यावे लागणार आहे. पिकांना मिळणारा भाव आणि खतांचे भाव याची तुलना करता शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडत नाही. ही वस्तुस्थिती आहे. तरीसुद्धा सरकारने खतांचे दर वाढवून शेतकऱ्यांच्या मानेवर सुरी ठेवली आहे. ही परिस्थिती असताना यंदाच्या खरीप हंगामावर आणखी एक … Read more

Cockroach Janata Party-कॉक्रोच जनता पार्टी जोमात सरकार कोमात

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार युवक आणि झुरळ यांच्या संबंधित वक्तव्यानंतर सोशल मीडियावर सरन्यायाधीश चांगले स्ट्रोल झाले. त्यातूनच तरुणांनी एक्सवर कॉक्रोच जनता पार्टी नावाचे अकाउंट काढले आणि या पार्टीने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला असून सरकारवर प्रचंड टीका होत आहे .अखेर 16 मे रोजी सुरू झालेले एक्स वरील कॉक्रोच जनता पार्टीचे अकाउंट गुरुवारी ब्लॉक … Read more

Heatwave Lockdown Situation-उष्माघाताच्या भीतीमुळे सकाळी दहा वाजताच लाॅकडाऊनची स्थिती.

ग्लोबल वार्मिंग आणि भारतात कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली जंगलतोड या कारणांमुळे देशात अनेक ठिकाणी प्रचंड उष्णता निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी तर उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात दुपारी लॉकडाऊन सदृश स्थिती निर्माण होणे हे काही नवे नाही; पण सकाळी दहा वाजता चक्क शहर ओस पडत असेल तर उष्णतेच्या दाहकतेची कल्पना … Read more