India defeats Pakistan match-भारताची पाकवर सहज मात

भारत पाकिस्तान यांच्यात विश्वचषकातील साखळी सामना होतो की नाही, यावर कितीतरी दिवस चर्चा रंगली होती;पण अखेर श्रीलंकेतील कोलंबो येथे भारत आणि पाकिस्तान यांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2026 मधील पहिली लढत झाली. यामध्ये भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. पाकिस्तानने भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता; पण अखेर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने भारताविरुद्ध खेळण्याचा निर्णय घेतला आणि … Read more

Tipu Sultan controversy Maharashtra-टिपू सुलतानवरून महाराष्ट्रात नवा वाद

मालेगाव महापालिकेतील उपमहापौर शानेहिंद निहाल अहमद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे.खरं तर इतिहासाचे ज्ञान नसलेल्या अनेक राजकीय पुढार्‍यांनी त्याचे भांडवल केले आहे. टिपू सुलतान हे कोण होते? त्यांनी काय कार्य केले?याबद्दल थोडे तरी माहिती असायला हवे. *टिपू सुलतान हे स्वातंत्र्य सेनानी होते: हर्षवर्धन सपकाळ* महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे … Read more

Zimbabwe national cricket team vs Australia national cricket team-ऑस्ट्रेलियाला झुंबाब्वेचा धक्का टी-20 विश्व करंडात झिम्बाब्वेचा सनसनाटी विजय

भारत- श्रीलंका या ठिकाणी सुरू असलेल्या टी 20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला झिंबाब्वेने नमवले आहे. या टी-ट्वेंटी स्पर्धेच्या इतिहासात झिंबाब्वेने ऑस्ट्रेलियाला दोन वेळा नमवले आहे. आणि विशेष म्हणजे झिंबाब्वे-ऑस्ट्रेलिया यांची टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दोन वेळा लढती झाल्या आहेत. त्याही झिंबाब्वेने जिंकल्या आहेत. 2007 मध्ये झालेल्या पहिल्या वाहिल्या टी-20 मध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियावर मात केली होती. … Read more

Tarique Rahman Bangladesh election-बांगलादेशात तारिक रहमान यांच्या बांगलादेश नॅशनल पार्टीला स्पष्ट बहुमत

बांगलादेशात तब्बल दीड वर्षांच्या हंगामी सरकार नंतर निवडणुका झाल्या. या निवडणुकीत बांगलादेश नॅशनल पार्टीला मोठा विजय मिळाला आहे. या पार्टीच्या त्यांच्या संसदमधील 300 पैकी 212 जागांवर विजय मिळाला आहे.त्यांचे प्रमुख स्पर्धक असलेल्या जमाती इस्लाम पक्षाच्या आघाडीला केवळ 77 जागा मिळाल्या आहेत. माजी पंतप्रधान बेगम खलिदा जिया यांचे पुत्र आणि बांगलादेश नॅशनल पार्टीचे अध्यक्ष तारिक रहमान … Read more

India 114 Rafale jets purchase-भारत 114 राफेल विमानांची खरेदी करणार

भारत सरकार फ्रान्स कडून 114 राफेल लढाऊ विमाने खरेदी करणार असल्याचा निर्णय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी झाला. *3.25 लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित* राफेल या लढावू विमाने खरेदीवर भारत सरकार सव्वा तीन लाख कोटी रुपये खर्च करणारा असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. *मेक इन इंडियाचाही समावेश* केंद्र … Read more

Rahul Gandhi latest controversy-राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या हालचाली?

अर्थमंत्री निर्मला सीताराम यांच्या अर्थसंकल्पीय अभिभाषणावर चर्चा करताना आणि भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाच्या चर्चेवर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला चांगलेच घेरले आहे .या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि विपक्ष यांच्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. राहुल गांधी यांना वारंवार बोलण्यास अडथळा निर्माण करण्याचे काम केंद्र सरकार म्हणजेच केंद्र सरकारमध्ये समाविष्ट असलेले गृहमंत्री अमित शाह, … Read more

Rohit Pawar statement-अजितदादांचा घातपातच! रोहित पवार

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अनिल सर्वांचे लाडके नेते राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. हा अपघात नसून घातपातच असल्याचा आरोप अजित पवार यांचे तेरावे दिवस झाल्यानंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले.रोहित पवार यांनी घेतलेली पत्रकार परिषद जवळ जवळ पावणे दोन तास चालली. त्यांनी अजितदादांच्या अपघातावर … Read more

India U19 World Cup Winning Six-19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारताचा विजयी षटकार

19 वर्षाखालील भारतीय युवा क्रिकेट खेळाडूंनी हरारे येथे शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकून षटकार ठोकला. भारताने हे विजेतेपद सहाव्यांदा मिळवले. यापूर्वी मोहम्मद कैफ( 2000)विराट कोहली( 2008),उन्मुक्त चंद (2012), पृथ्वी शॉ (2018) यश धूल (2022 )यांच्या नेतृत्वात भारताने विश्वविजेता हा मान पटकावला होता. वैभव सूर्यवंशी ची अतुलनीय कामगिरी भारताचा चौदा वर्षाचा … Read more

Mobile game addiction impact-मोबाईल गेमचे जडले व्यसन: तीन बहिणींनी केली आत्महत्या

अनेक प्रगत देशांमध्ये लहान मुलांच्या मोबाईल वापरावर बंदी घालण्यात येत आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या मानसिकतेवर मोठे परिणाम होतात. आणि त्यामुळे त्यांना इतर काही सुचत नाही. अशी स्थिती निर्माण होते. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील धक्कादायक घटना अशीच घडली. बुधवारी( दिनांक 4 फेब्रुवारी2026) पहाटे एका इमारतीत नवव्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीतून तीन अल्पवयीन बहिणींनी पालकांनी मोबाईल वापरावर बंदी … Read more

West Bengal vs Central Government news-केंद्र सरकार पश्चिम बंगालला टार्गेट करत आहे: लोकशाही वाचवा. ममता बॅनर्जींची सर्वोच्च न्यायालयाला विनंती

इडी ,निवडणूक आयोग इत्यादींच्या माध्यमातून केंद्र सरकार पश्चिम बंगाल सरकारला टार्गेट करत आहे. पश्चिम बंगालमधील लोकशाही वाचवा असे ममता बॅनर्जींनी स्वतःच वकिलाच्या भूमिकेत सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. केंद्र सरकार अक्षरशः जनतेवर बुलडोझर चालवत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी न्यायालयात केला. ममता बॅनर्जींच्या या परखड भूमिकेमुळे संपूर्ण भारतीयांचे लक्ष पश्चिम बंगाल खटल्यावर केंद्रित झाले आहे. *ममता … Read more