Monsoon arrives in Kerala-अखेर मान्सूनचा गडगडात सुरू: 48 तासात केरळात धडकणार

देशभरातील संपूर्ण शेतकरी, नागरिक आणि हवामान तज्ज्ञांच्या नजरा सध्या नैर्ऋत्य मान्सूनच्या आगमनाबाबत लागल्या होत्या. अखेर दिलासादायक बातमी आली आहे. पुढील 48 तासात म्हणजे चार जूनच्या सुमारास मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने काल मंगळवारी व्यक्त केला आहे. त्यामुळे तेथून पुढील आठवड्यात दक्षिण भारतात आणि त्यानंतर हळूहळू मध्य भारतात आणि संपूर्ण भारतात … Read more

Maharashtra farmer loan waiver-शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमुक्ती: महाराष्ट्रातील 55.72 लाख शेतकऱ्यांना लाभ

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमुक्ती जाहीर केलेली आहे. शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत उचललेल्या अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2015 अखेर थकीत असलेली व 31 मार्च 2026 अखेर परत फेड न झालेली किंवा अनेक बँकांमधील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह रक्कम दोन लाखांपर्यंत आहे अशांना कर्जमाफी … Read more

US Iran talks suspended-लेबनॉन वरून अमेरिका- इराण चर्चा स्थगित

इस्रायलच्या लेबनाॅनवरील हल्ल्याने युद्धविराम धोक्यात आला आहे. इराण- अमेरिका यांच्यात युद्ध विरामासाठी गेले काही दिवस चर्चेच्या फेऱ्या चालू आहेत; पण लेबनॉनमधील लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर इराणने अमेरिकेसोबतची चर्चा स्थगित केल्याचे इराणच्या सरकारी माध्यमांनी जाहीर केले आहे. असे वृत्त सीएनएन या अमेरिकेच्या वृत्तवाहिनीने दिले आहे. होर्मुझ खाडीतील नाकेबंदीमुळे संपूर्ण जगाला झळ बसत आहे. पेट्रोल- डिझेलच्या किमतीत प्रचंड … Read more

Gokul dairy election news-गोकुळच्या निवडणुकीवरून वातावरण तापले: 441 संस्था अपात्र. गोकुळच्या निवडणुकीवरून वातावरण तापले: 441 संस्था अपात्र

कोल्हापूर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी दूध संस्था म्हणून ओळखली जाणाऱ्या गोकुळ दूध संस्थेची निवडणूक लागली आहे. गेले दोन महिने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपाने गोकुळच्या निवडणुकीला चांगलाच रंग आला आहे. गोकुळ निवडणुकीची मुदत संपल्याने संचालक मंडळ बरखास्त करून काही काळासाठी प्रशासकीय मंडळ आले होते;पण पुन्हा आता निवडणूक लागली आहे. या निवडणुकीत दूध संस्थांच्या … Read more

Suman Kalyanpur passes away-सुमन कल्याणपूर काळाच्या पडद्याआड

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांचे वयाच्या 89 व्या वर्षी रविवारी सायंकाळी अंधेरी येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने हिंदी, मराठी चित्रपट सृष्टीतील सुवर्ण युगातील देदीप्यमान पर्व अस्तंगत झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवार दिनांक 2 जून 2026 रोजी अंत्यसंस्कार करण्यात येतील. अष्टपैलू गायिका सुमन कल्याणपुर यांचा आवाज म्हणजे साक्षात सुरांचा अभिषेक होता. त्यांच्या … Read more

EV car buying guide-पेट्रोल महागले: EV कार खरेदी करताय?पण लक्षात असू द्या

सध्या भारतात रुपया घसरल्यामुळे पेट्रोलचे दर भडकले आहेत. याशिवाय साठेबाजी व अन्य कारणांमुळेही पेट्रोलचे दर भडकले आहेत. त्यामुळे वाहनधारकांचा कल इव्ही कारकडे वळत चालला आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार झपाट्याने वाढत आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती सरकारी प्रोत्साहन आणि पर्यावरण पूरक पर्याय म्हणूनही वेगळा पर्याय म्हणून ग्राहकांचा कल वाढताना दिसतो आणि ग्राहक वाहन खरेदी करण्याचा … Read more

Avinash Phogat defeated-अविनाश फोगाटचे स्वप्न भंगले: निवडचाचणीत उपान्त्य फेरीत पराभूत

जागतिक कीर्तीची पैलवान विनेश फोगाटला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर आशियाई स्पर्धेच्या कुस्ती निवड चाचणीत महिलांच्या 53 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत मीनाक्षी गोयत विरुद्ध चार-सहा अशी पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडली आहे. विनेश फोगाटला हा खूप मोठा धक्का मानला जातो. या पराभवामुळे विनेशचे पुनरागमन करण्याचे आणि जपान मधील आयची नागोया येथे यंदा होणाऱ्या एशियाडमध्ये स्थान … Read more

Radhanagari Wildlife Sanctuary-प्रचंड उष्णता आणि राधानगरी अभयारण्यातील कृत्रिम पाणवठे

कडक उन्हाळ्यात वन्यजीवांचेही मोठ्या प्रमाणात पाण्यावाचून हाल होत असते. या अनुषंगाने राधानगरी अभयारण्य क्षेत्रात वन विभागामार्फत अनेक ठिकाणी कृत्रिम पाणवठे उभारले आहेत. त्यामुळे अभयारण्यात कार्यरत असलेले रानगवे, बिबटे, अस्वले, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी या सर्वांना मुबलक पाणी मिळत आहे. उन्हाळ्यात आणि तेही कडक उन्हाळ्यात प्राण्यांना पाण्यासाठी दहा-दहा किलोमीटर धाव घ्यावी लागते. दिवस दिवसभर तहान लागलेली असूनही … Read more

National Testing Agency controversy-सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा संस्थेला सुनावले

सर्वोच्च न्यायालयाने नीट-युजी 2026 प्रश्नपत्रिका गळती प्रकरणात राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA)आणि केंद्र सरकारला शुक्रवारी चांगलेच फैलावर घेतले. नीट परीक्षेचा पेपर फुटूनही शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. सरकारला विद्यार्थ्यांच्या नुकसानीची काळजी नाही असाच त्याचा अर्थ होतो. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने एनटीएवर चांगलेच तास ताशेरे ओढले. जबाबदार घटकावर कारवाई करा सर्वोच्च न्यायालयाने नीट-युजी प्रश्नपत्रिका फुटल्याबद्दल तीव्र संताप … Read more

90 percent rainfall prediction-चालू वर्षी पुरेशा पावसाची अपेक्षा कमीच: 90 टक्के पावसाची शक्यता

गेल्या आठ ते दहा वर्षात महाराष्ट्रात पुरेसा पाऊस लागलेला आहे. काही वेळा अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस लागलेला आहे.त्यामुळे अतिवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये नुकसान झाले असले तरी पुरेशा पावसामुळे महाराष्ट्र पाण्यामुळे समृद्ध झाला होता. देशात यंदाच्या नैर्ऋत्य मान्सून हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी व्यक्त केला जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात … Read more