Medieval India-सत्तेचा विस्तार 

*मध्ययुगीन भारत

• अकबराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा सलीम ऊर्फ जहांगीर बादशाहा झाला.

• जहांगीरला राजपुत्र सुसरोच्या बंडाला तोंड द्यावे लागले.

• जहांगीरने बंगाल, पंजाबमधील कांगडा प्रदेश जिंकून घेतले.

• जहांगीरचा मृत्यू इ. स. 1627 मध्ये झाला.

• जहांगीर न्यायी होता.

• त्याचा ‘तुझुक-इ-जहांगिरी’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे.

• जहांगीरची पत्नी ‘नूरजहान’ इतिहासप्रसिद्ध व्यक्ती होती.

• जहांगीरच्या कारभारात नूरजहानचा सहभाग असे.

• तिचा सुसंस्कृतपणा आणि बुद्धिमत्ता या गोष्टींचा जहांगीरवर प्रभाव होता.

• ती निसर्गप्रेमी आणि कलासक्त होती.

*शाहजहान:

• जहांगिराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा ‘शाहजहान’ बादशाह झाला.

• इ. स. 1636 मध्ये आदिलशाहीच्या मदतीने त्याने निजामशाहीचा पाडाव केला.

• इ. स. 1657 मध्ये शाहजहान आजारी पडला आणि त्याच्या पुत्रांच्यात वारसायुद्ध सुरू झाले.

• औरंगजेबाने शाहजहानला नजरकैदेत टाकले. इ. स. 1666 मध्ये नजरकैदेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.

• पत्नीच्या अकाली मृत्यूने शाहजहान घायाळ झाला होता.

• पत्नी मुमताज महलच्या आठवणीखातर त्याने आग्रा येथे ‘ताजमहाल’ बांधला.

*औरंगजेब:

• इ. स. 1658 मध्ये औरंगजेब मुघल बादशाह झाला.

• औरंगजेबाने काश्मीर, अहमदनगर, आसाम, दक्षिण महाराष्ट्र जिंकून आपले साम्राज्य वाढवले होते.

• औरंगजेबाच्या काळात मुघल सत्ता भारतभर पसरली होती.

• पठाणांनी 1667 मध्ये मुघल सत्तेविरुद्ध बंड केले होते.

• जाटांनी 1669 मध्ये बंड केले होते.

• शिखांचे नववे गुरू गुरूतेबाबहादूर यांच्याशी औरंगजेबाचे सलोख्याचे धोरण होते.

• औरंगजेबाच्या असहिष्णु धार्मिक धोरणामुळे शीख-मुघल संघर्ष सुरू झाला.

• औरंगजेबने गुरू तेगबहादूर यांना कैद करून त्यांचा शिरच्छेद केला.

• गुरूगोविंदसिंग :

• गुरूतेगबहादूर यांच्या मृत्यूनंतर गुरूगोविंदसिंग शिखांचे दहावे गुरू झाले.

• गुरूगोविंदसिंग यांनी शीख समाज एकजूट केला.

• त्यांनी तरुणांना एकत्र करून एक दल उभे केले. त्याला ‘खालसा दल’ म्हणतात.

• ‘आनंदपूर’ हे शिखांचे प्रमुख केंद्र होते.

• गुरूगोविंदसिंग महाराष्ट्रातील नांदेड येथे असताना त्यांच्यावर खुनी हल्ला झाला.

• इ. स. 1708 मध्ये गुरूगोविंदसिंग यांचा खून झाला.

*औरंगजेब-मराठा संघर्ष:

• शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले होते.

• मराठी सत्ता मोडीत काढण्यासाठी 1682 साली औरंगजेब महाराष्ट्रात आला.

• मराठ्यांचा राजा छत्रपती संभाजी महाराज यांना कैद करून त्यांची क्रूरपणे हत्या केली.

• मराठ्यांची सत्ता नेस्तनाबूत करण्यासाठी औरंगजेबाने आटोकाट प्रयत्न केले; परंतु त्यात तो अयशस्वी झाला.

• मराठ्यांशी संघर्ष सुरू असताना 1707 मध्ये अहमदनगर येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला.

• औरंगजेबानंतरचे मुघल बादशाह :

• औरंगजेबानंतर त्याचा मुलगा बहादूरशाह गादीवर बसला.

• त्याची कारकीर्द अल्प काळ ठरली.

• इ. स. 1739 मध्ये इराणचा बादशाह नादिरशहाने दिल्लीवर आक्रमण केले.

• त्याने मयूर सिंहासन व कोहिनूर हिऱ्यासह येथील संपत्तीची लूट केली.

• अब्दालीने दिल्लीवर आक्रमण केले.

• इ. स. 1761नंतर मुघलशाही नाममात्र राहिली.

Leave a comment