Pre-Shiva Maharashtra-शिवपूर्वकालीन महाराष्ट्र जाणून घ्या सविस्तर

*महाराष्ट्रातील प्रशासन :

• शिवपूर्वकाळात महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश विजापूरचा आदिलशाह, अहमदनगरचा निजामशाहा यांच्या ताब्यात होता.

• कोकण किनारपट्टीवर सिद्धी व पोर्तुगीज यांच्या सत्ता होत्या.

• आपले प्रशासन चालवण्यासाठी निजामशाहा व आदिलशाहा स्थानिक तोकांची मदत घेत.

• किल्लेदार, हिशेबनीस, कारकून अशा पदांवर स्थानिक मराठी लोक असत.

• मराठी सरदार व सैनिक यांना लष्करात मोठ्या प्रमाणात स्थान होते

• मराठी सरदारांना जहागिरी दिल्या.

• मराठी सरदारांपैकी मोरे, घाटगे, निंबाळकर, जाधव, घोरपडे,स भोसले इत्यादी घराणी प्रसिद्ध होती.

• जमीन महसूल गोळा करण्याचे काम देशमुख, देशपांडे करत. त्याना वतन मिळत. वतन मिळालेल्या अधिकाऱ्याला वतनदार म्हणत.

• वतनदार शिरजोर बनत, राजाचे जमानत नसत. रयतेचे शोषण करत.

*सामाजिक स्थिती:

• समाजात सत्ताधारी वर्ग व सर्वसामान्य वर्ग असे दोन वर्ग निर्माण झाले होते.

• जमीन उत्पादनक्षमता कमी होती. शेती पावसावर अवलंबून होती.

• शेतकऱ्यांना दुष्काळांना तोंड द्यावे लागे.

• राज्यकर्त्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत असे.

*संतांचे कार्य :

• समाजात अंधश्रद्धा व कर्मकांड यांचा प्रभाव होता.

• लोक देवदेवतांच्या आहारी गेले होते.

• लोकांच्यातील प्रयत्नशीलता कमी झाली होती.

• संतांनी समाजात चैतन्य निर्माण केले.

• आपली संस्कृती, भाषा, प्रदेश याचा अभिमान निर्माण केला.

• संत ज्ञानेश्वरांनी ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय साधला.

• संत नामदेवांनी निरर्थक कर्मकांडावर टीका केली.

• संत एकनाथांनी कर्मठपणास विरोध केला.

• संतांच्या संदेशांमुळे महाराष्ट्रात आत्मविश्वास निर्माण झाला.

Leave a comment