प्राचीनभारत महाजनपदे
इसवी सन पूर्व सहाव्या शतकाच्या सुरुवातीला उत्तर भारतात अनेक राज्ये होती. त्यांना ‘जनपदे’ आणि ‘महाजनपदे’ असे म्हणत.
महाजनपदांमध्ये ज्येष्ठ व जबाबदार नागरिकांची एक ‘गणपरिषद’ असे. राज्यातील सर्वोच्च अधिकार गणपरिषदेकडे असत.
*सोळा महाजनपदे :
(१) काशी (बनारस), (२) कोसल (लखनौ), (३) मल्ल (गोरखपूर), (४) वत्स (अलाहाबाद), (५) चेदी (कानपूर), (६) कुरू (दिल्ली), (७) पांचाल (रोहिखंड), (८) मत्स्य (जयपूर), (९) शूरसेन (मथुरा), (१०) अश्मक (औरंगाबाद), (११) अवंती (उज्जैन), (१२) अंग (चंपा-बिहार), (१३) मगध (दक्षिण बिहार), (१४) गांधार (पेशावर), (१५) वृज्जी (उत्तर बिहार), (१६) कंबोज (गांधारजवळ). काही महत्त्वाची महाजनपदे खालीलप्रमाणे
*कोसल:
• नेपाळ व उत्तर प्रदेशच्या काही भागात ‘कोसल’ राज्य होते.
• ‘सांकेत’ ही कोसल राज्याची राजधानी होती.
• या राज्यातील श्रावस्ती व कुशावती ही नगरे प्रसिद्ध होती.
• कोसलराजा प्रसेनजित हा गौतम बुद्धांचा समकालीन होता.
• प्रसेनजितच्या काळात कोसल आणि मगध यांच्यात युद्ध झाले.
*वत्स:
• आजच्या अलाहाबादजवळील ‘कौशांबी’ ही वत्स राज्याची राजधानी होती.
•या राजाची माहिती बौद्ध वाङ्मयात व संस्कृत नाटककार ‘भास’ यांच्या नाटकातून मिळते.
• या राज्यात तयार होणारे तलम कापड फार प्रसिद्ध होत
• राजा उदयननंतर बत्सराज्याचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकू शकले नाही.
*अवंती :
• ‘प्रद्योत’ हा अवंतीच्या राजांपैकी एक महत्वाचा राजा होता,
• आजच्या मध्य प्रदेशातील ‘उज्जयिनी’ ही त्याची राजधानी होती.
• ‘उज्जयिनी’ हे शहर प्रसिद्ध व्यापारी केंद्र होते.
• अवंतीचे राज्य मगध राज्यात विलीन झाले,
*मगध:
• बिहारच्या परिसरात गंगा व शोण नदीच्या खोऱ्यात मगध राज्य पसरले होते.
• ‘बिंबिसार’ या राजाच्या काळात राज्यविस्तार सुरू झाला.
• बिंबिसारने काशी, मद्र, अवंती, कोसल ही राज्ये आपल्या राज्यास जोडली.
• ‘राजगृह’ म्हणजेच राजगीर (बिहार) ही मगधची राजधानी होती.
• बिंबिसारच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता.
• बिंबिसारचा मुलगा अजातशत्रू याने राज्यविस्ताराची मोहीम पुढे चालू ठेवली.
• त्याने जैन व बौद्ध धर्माला राजाश्रय दिला.
• तो गौतमबुद्धांचा समकालीन होता. त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता.
• बौद्ध धर्माची पहिली परिषद अजातशत्रूने ‘राजगृह’ या ठिकाणी भरवली.
*मगधचे नंद राजे:
• इ. स. पूर्व 364 ते इ. स. पूर्व 324 या काळात मगधचे नंद राजे राज्य करीत होते.
• प्राचीन भारताच्या इतिहासातील हे पहिले साम्राज्य होते.
• नंद घराण्याचा शेवटचा राजा ‘धनानंद’ हा होता.
• चंद्रगुप्त मौर्य या महत्त्वाकांक्षी तरुणाने चाणक्याच्या मदतीने नंद घराण्याची सत्ता नष्ट केली व आपण स्वतः राजा झाला.
• नंद राजांकडे चतुरंग (पायदळ, घोडा, हत्ती, रथ) सैन्य होते.
*परकीय आक्रमणे :
• मगध साम्राज्याच्या उदयाच्या वेळी इराणचा सम्राट दार्यूश भारताच्या वायव्येकडील गांधार, सिंध प्रदेशांवर आक्रमण करून ते जिंकले
• त्यामुळे भारत-इराण यांच्यात व्यापार व कलेची देवाण-घेवाण सुरु झा
*सिकंदरची स्वारी :
• ग्रीक राजा अलेक्झांडर ऊर्फ सिकंदर याने इराणच्या साम्राज्याचा पाडा
• सिकंदराने भारतावर स्वारी करून येथील राजांशी निकराची लढाई केल.
• भारतातील कडव्या प्रतिकाराने सिकंदरचे सैनिक घायाळ झाले होते.
• जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावण्यास सिकंदर असमर्थ ठरला हो
• बराच काळ बाहेर राहिल्यामुळे त्याच्या सैनिकांना मायदेशी जायचे हो त्यामुळे त्याच्या सैनिकांनी बंड केले.
• अखेर जग जिंकण्यासाठी आलेला सिकंदर भारतातून माघारी फिरला
• वाटेत बॅबिलॉन येथे इ. स. पूर्व 323 साली त्याचा मृत्यू झाला.
*भारत-ग्रीस संबंध:
• सिकंदरच्या स्वारीमुळे भारत-ग्रीस संबंध वाढले. दळणवळण व्या वाढला.
• ग्रीक शिल्पकलेचा भारतीय शिल्पकलेवर प्रभाव पडला आहे.
• त्यातून ‘गांधार’ शिल्पकलेचा जन्म झाला.
• ग्रीकांच्या नाण्यावर एका बाजूला राजाचे व दुसऱ्या बाजूला एखा देवतेचे चित्र असे.
• भारतीयांनी ग्रीकांकडून नाणी काढण्याची कला घेतली.