मुघल काळात भारताच्या आर्थिक व सामाजिक जीवनात अनेक बदल घडून आहे
*आर्थिक जीवन:
• भारतीय समाज मुघल काळात कृषिप्रधान होता.
• तंबाखू, बटाटा, मका इत्यादी नवीन पिके शेतकरी घेऊ लागला.
• मुघल राज्यकर्त्यांनी शेतीला उत्तेजन दिले.
• शेतकऱ्यांना बी-बियाणे, शेतीची अवजारे खरेदी करण्यासाठी तगड दिली जात असे.
• शेतीखेरीज गुजरात, बंगाल, ओडिशा या प्रांतांत कापडनिर्मितीचे उद्योग मोठ्या प्रमाणात होऊ लागले.
• रेशमी कापडासाठी आग्रा, पाटणा, खंबायत, पैठण इत्यादी ठिकाणे प्रसिद्ध होती.
● मुघल राज्यकर्त्यांनी अनेक हमरस्ते बांधून वाहतुकीची सोय केली.
• प्रवाशांच्या विश्रांतीसाठी ‘सराय’ म्हणजेच धर्मशाळा बांधल्या. • मुघल काळात चांदीचा ‘रुपया’ हे नाणे भारतभर झाले.
• मुघल काळात सुरत, भरुच, कोचीन, प्रमाणभूत मानले जाई. हगळी इत्यादी बंदरांची वाढ झाली.
• भारताचा अंतर्गत व आतरराष्ट्रीय व्यापार वाढीस लागला.
*व्यवसाय:
• धान्य, कापूस, कापड, मीठ, शिसे, सुगंधी द्रव्ये इत्यादी वस्तूंचा व्यापार देशामध्ये चालत असे.
•मालाची वाहतूक करण्यासाठी घोडे, बैल, उंट, गाढवे, बैलगाड्या यांचा द्वापर केला जाई.
• भारतातून मुख्यतः मसाल्याचे पदार्थ, अफू, कापड, काष्ठौषधी, नीळ इत्यादी गोष्टींची निर्मिती होत असे.
• सोने, चांदी, तांबे, कथिल, जस्त, पारा इत्यादी गोष्टींची भारतात आयात होत असे.
• अठराव्या शतकात केंद्रीय सत्तेच्या दुर्बलतेमुळे व्यापार मंदावला.
*समाजजीवन :
• मुघलकालीन भारतीय समाजात आर्थिकदृष्ट्या सर्वसाधारणपणे तीन वर्ग होते.
• पहिला वर्ग – राजघराण्यातील लोक, अमीर-उमराव, जमीनदार, मन्सबदार,
• दुसरा वर्ग – दुय्यम अधिकारी, व्यापारी, छोटे वतनदार.
• तिसरा वर्ग – शेतकरी, कारागीर, शेतमजूर.
• तत्कालीन समाजावर अंधश्रद्धेचा प्रभाव होता.
• तत्कालीन शिक्षण पद्धती ही अंधश्रद्धा दूर न होण्यास कारणीभूत होती.
• हिंदूंच्या पाठशाळा आणि मुसलमानांच्या मदरसा या शिक्षण देणाऱ्या प्रमुख संस्था होत्या.
• हिंदू समाजात शिक्षण घेण्याचा हक्क फक्त उच्चवर्णीयांना होता.
• बहुतांश शिक्षण धार्मिक होते. राजकारण, अर्थकारण, विज्ञान याबाबत समाजात उदासीनता होती.
• समाजात कर्मकांड व आचारधर्माचे स्तोम वाढले होते.
• सामान्य महिला सामाजिक गुलामगिरीत होत्या.
• स्त्रियांना शिक्षणाचा व धार्मिक विधी करण्याचा अधिकार नव्हता.
• बालहत्या, सती, पडदा पद्धत अशा अनेक प्रथा समाजात प्रचलित होत्या.
• तरीसुद्धा राणी दुर्गावती, चांदबिबी, नूरजहान, जिजाबाई, ताराबाई, इत्यादी कर्तृत्ववान स्त्रिया त्या काळात होऊन गेल्या.
• सरबत हे मध्य आशियातील पेय, तसेच जिलेबी हे मिष्टान्न भारतात लोकप्रिय झाले.
• ‘पोलो’ हा जगप्रसिद्ध खेळ मुघलांनी भारतात आणला.