Mughal period-मुघल काळातील आर्थिक आणि सामाजिक जीवन (1500 AD ते 1750 AD)

मुघल काळात भारताच्या आर्थिक व सामाजिक जीवनात अनेक बदल घडून आहे

*आर्थिक जीवन:

• भारतीय समाज मुघल काळात कृषिप्रधान होता.

• तंबाखू, बटाटा, मका इत्यादी नवीन पिके शेतकरी घेऊ लागला.

• मुघल राज्यकर्त्यांनी शेतीला उत्तेजन दिले.

• शेतकऱ्यांना बी-बियाणे, शेतीची अवजारे खरेदी करण्यासाठी तगड दिली जात असे.

• शेतीखेरीज गुजरात, बंगाल, ओडिशा या प्रांतांत कापडनिर्मितीचे उद्योग मोठ्या प्रमाणात होऊ लागले.

• रेशमी कापडासाठी आग्रा, पाटणा, खंबायत, पैठण इत्यादी ठिकाणे प्रसिद्ध होती.

● मुघल राज्यकर्त्यांनी अनेक हमरस्ते बांधून वाहतुकीची सोय केली.

• प्रवाशांच्या विश्रांतीसाठी ‘सराय’ म्हणजेच धर्मशाळा बांधल्या. • मुघल काळात चांदीचा ‘रुपया’ हे नाणे भारतभर झाले.

• मुघल काळात सुरत, भरुच, कोचीन, प्रमाणभूत मानले जाई. हगळी इत्यादी बंदरांची वाढ झाली.

• भारताचा अंतर्गत व आतरराष्ट्रीय व्यापार वाढीस लागला.

*व्यवसाय:

• धान्य, कापूस, कापड, मीठ, शिसे, सुगंधी द्रव्ये इत्यादी वस्तूंचा व्यापार देशामध्ये चालत असे.

•मालाची वाहतूक करण्यासाठी घोडे, बैल, उंट, गाढवे, बैलगाड्या यांचा द्वापर केला जाई.

• भारतातून मुख्यतः मसाल्याचे पदार्थ, अफू, कापड, काष्ठौषधी, नीळ इत्यादी गोष्टींची निर्मिती होत असे.

• सोने, चांदी, तांबे, कथिल, जस्त, पारा इत्यादी गोष्टींची भारतात आयात होत असे.

• अठराव्या शतकात केंद्रीय सत्तेच्या दुर्बलतेमुळे व्यापार मंदावला.

*समाजजीवन :

• मुघलकालीन भारतीय समाजात आर्थिकदृष्ट्या सर्वसाधारणपणे तीन वर्ग होते.

• पहिला वर्ग – राजघराण्यातील लोक, अमीर-उमराव, जमीनदार, मन्सबदार,

• दुसरा वर्ग – दुय्यम अधिकारी, व्यापारी, छोटे वतनदार.

• तिसरा वर्ग – शेतकरी, कारागीर, शेतमजूर.

• तत्कालीन समाजावर अंधश्रद्धेचा प्रभाव होता.

• तत्कालीन शिक्षण पद्धती ही अंधश्रद्धा दूर न होण्यास कारणीभूत होती.

• हिंदूंच्या पाठशाळा आणि मुसलमानांच्या मदरसा या शिक्षण देणाऱ्या प्रमुख संस्था होत्या.

• हिंदू समाजात शिक्षण घेण्याचा हक्क फक्त उच्चवर्णीयांना होता.

• बहुतांश शिक्षण धार्मिक होते. राजकारण, अर्थकारण, विज्ञान याबाबत समाजात उदासीनता होती.

• समाजात कर्मकांड व आचारधर्माचे स्तोम वाढले होते.

• सामान्य महिला सामाजिक गुलामगिरीत होत्या.

• स्त्रियांना शिक्षणाचा व धार्मिक विधी करण्याचा अधिकार नव्हता.

• बालहत्या, सती, पडदा पद्धत अशा अनेक प्रथा समाजात प्रचलित होत्या.

• तरीसुद्धा राणी दुर्गावती, चांदबिबी, नूरजहान, जिजाबाई, ताराबाई, इत्यादी कर्तृत्ववान स्त्रिया त्या काळात होऊन गेल्या.

• सरबत हे मध्य आशियातील पेय, तसेच जिलेबी हे मिष्टान्न भारतात लोकप्रिय झाले.

• ‘पोलो’ हा जगप्रसिद्ध खेळ मुघलांनी भारतात आणला.

Leave a comment