ऑपरेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला. या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या युद्धात परिवर्तन होते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करून सीझ फायर घडवून आणले. युद्ध तर थांबले, पण काय झाले पुढे? ते पाहू.
सीझ फायर म्हणजे काय? What is ceasefire?
सीझ फायर म्हणजे दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी करून चाललेले युद्ध तात्पुरते थांबवणे होय.
सीझ फायर कसे घडले? How did the ceasefire happen?
22 एप्रिल 2025 च्या पहलगाम हत्याकांडानंतर भारत सरकारने पाकिस्तानला याचा बदला घेऊ असे सांगितले होते. त्याप्रमाणे भारताने ऑपरेशन सिंदूरची मोहीम हातात घेऊन पाकिस्तानमधील आणि पाक व्याप्त काश्मीर मधील दहशतवादी स्थळे उद्ध्वस्त केली होती. आठ मे च्या पहाटेच्या रात्री भारतीय लष्कराने जे काही केले त्यामुळे संपूर्ण पाकिस्तान हादरून गेले होते. त्यानंतर पाकिस्तानने भारतातील अनेक लष्करी ठाण्यांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. भारताने हे सर्व हल्ले परतवून लावून पुन्हा पाकिस्तानचे कंबरडे मोडले. पाकिस्तान हादरून गेला. पाकिस्तान सरकारला काय करायचे हे सूचेना. शेवटी अमेरिकेला विनवण्या करून भारत सरकारशी मध्यस्थी करायला लावले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हे आयतेच कोलीत मिळाले. त्यांनी भारतीय मोदी सरकारवर दबाव टाकत सीझ फायर घडवून आणले. युद्ध थांबले खरे पण त्याचे पडसाद पाकिस्तान मध्ये आणि भारतामध्येही मोठ्या प्रमाणात उमटले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर व्यापार उद्योगाचा दबाव टाकून भारताला सीझ फायर करण्यास भाग पाडले. त्यामुळे संपूर्ण भारत युद्धात जिंकले, पण तहात हरले. अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या. खरंतर भारत सरकारला पाक व्याप्त काश्मीर घेण्यास चांगली संधी निर्माण झाली होती. पाकिस्तानला दहशत बसवण्यास आलेली संधी भारताने गमावली. त्यामुळे भारतात या सीझ फायर बद्दल नाराजी व्यक्त होत आहे.
1971 चे युद्ध आणि सीझ फायर :Battle of 1971 and ceasefire
1971 साली पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान यांच्यात कमालीचा संघर्ष निर्माण झाला. हा संघर्ष इतका टोकाला गेला की पूर्व पाकिस्तानवर पश्चिम पाकिस्तानचा प्रचंड दबाव निर्माण झाला. त्यानंतर पूर्व पाकिस्तानने भारत सरकारला म्हणजे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना विनंती केली की पश्चिम पाकिस्तान पासून आमची सुटका करा. आम्हाला स्वतंत्र देश बनवायचा आहे. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे कंबरडे मोडण्यास मिळालेली संधी सोडली नाही. त्यांनी पाकिस्तानबरोबर युद्ध पुकारून आठ दिवसातच पाकिस्तानचा पूर्ण पराभव केला. पाकिस्तान गुडघे टेकत शरण आला. भारताने घातलेल्या सर्व अटी पाकिस्तानने मान्य केल्या आणि त्यामुळे पाकिस्तानचे दोन भाग पडले .यातून बांग्लादेश या नवीन देशाचा उगम झाला. पाकिस्तानचे 90 हजार कैदी भारत सरकारने पकडले होते. हे कैदी सोडवून घेण्यासाठी पाकिस्तानने दीडशे कोटी देण्याचे मान्य केले होते. पण पुढे इंदिरा गांधी यांचे सरकार बदलले आणि मोरारजी देसाई यांचे सरकार आले. त्यावेळचे परराष्ट्रमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी हे दीडशे कोटी रुपये पाकिस्तानला माफ झाले. हे कर्ज माफ करून भारत सरकारने एक मोठी चूक केली होती. 1971 च्या युद्धात पाकिस्तानचा पूर्ण पराभव झाला होता. पण मे 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जे काही आंतरिक युद्ध झाले. त्याला युद्ध असे न म्हणता ऑपरेशन सिंदूरचा तो एक भाग होता.या दोन लढायांत खूप मोठा फरक आहे. 2025 मध्ये भारत सरकारने अमेरिकेच्या दडपणाखाली सीझ फायर केल्यामुळे 1971 च्या विजयाची तुलना 2025 च्या सीझ फायरशी करणे हास्यस्पद आहे.
पाकिस्तानमध्ये काय घडले? What happened in Pakistan after Operation Sindoor ?
आठ मे 2025 रोजी पहाटे भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. पाक व्याप्त काश्मीर मधील दहशतवादी स्थळे, लाहोर येथील एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करून भारतीय लष्कराने पाकिस्तान वर चांगलाच दबाव निर्माण केला होता. त्यामुळे पाकिस्तानी जनता हैराण झाली होती. पाकिस्तानमधील संसद सदस्यही हे युद्ध थांबवा असे सरकारला आणि लष्कराला विनंती करत होते. पाकिस्तानची आर्थिक स्थिती अगोदरच नाजूक अवस्थेत आहे. ती आणखीनच बिघडणार आहे, हे पाकिस्तानी जनतेने ओळखले होते. म्हणूनच पाकिस्तानी जनतेचा सरकारवर युद्ध थांबवण्यासाठी दबाव वाढत होता. म्हणूनच पाकिस्तान सरकारने अमेरिकेच्या मदतीने भारत सरकारला सीझ फायर करण्यास भाग पाडले. अर्थात सीझ फायर होणे हे पाकिस्तानच्या हिताचे होते. पाकिस्तान तीन ते चार दिवसांपेक्षा अधिक काळ युद्धात टिकत नव्हता. युद्ध सुरू झाल्यानंतर जी बिकट अवस्था होणार होती याची जाणीव पाकिस्तानी जनतेला होती. त्यातूनच पाकिस्तान सरकारने अमेरिकेच्या आडून सीझ फायर घडवून आणले. सीझ फायर झाले आणि आम्हीच कसे जिंकलो असा कांगावा पाकिस्तानने संपूर्ण जगासमोर करण्यास सुरुवात केली.
सीझ फायर नंतर भारतात काय घडले? What happened in India after ceasefire?
आठ मे 2025 च्या पहाटेच्या रात्री भारतीय लष्कराने जो काही पराक्रम केला आणि दहशतवाद्यांचा बिमोड केला, त्याचा भारतीय जनतेला अभिमान वाटला. भारतीय जनतेने वेगवेगळ्या माध्यमातून लष्कराचे कौतुक करायला सुरुवात केले. भारतातील विरोधी पक्ष नेत्यांनी भारतीय लष्कराला आणि भारत सरकारला संपूर्ण पाठिंबा दिला. त्यामुळे भारतीय लष्कराला बळ आले. ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर पाकिस्तानने भारतीय लष्करावर हल्ला करण्याचा केविलवाना जो प्रयत्न केला ,तो प्रयत्न भारतीय लष्कराने पूर्णतः निष्प्रभ करून टाकला. भारतीय लष्कराची वाहवा होत होती. इकडे भारतीय जनतेमध्ये आनंद होता. भारतीय लष्कर पाक व्याप्त काश्मीर ताब्यात घेणार, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. असे असताना आणि पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केली असताना भारतातील मोदी सरकारने अचानक सीझ फायरचा निर्णय घेतला. हा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावामुळे घेतला असे भारतीय जनतेत वातावरण निर्माण झाले. त्यामुळे भारतीय जनता आणि भारतीय लष्करही नाराज झाले. एकदाच काय ते होऊ द्या, अशा स्वरूपाची भावना भारतीय जनतेची होती. पण भारताने सीझ फायर करून भारतीय जनतेला नाराज केले. मोदी सरकारने घेतलेला हा अत्यंत चुकीचा निर्णय होता. सीझ फायरची चर्चा ही दोन राष्ट्रांमध्येच व्हायला हवी होती. अमेरिकेच्या मध्यस्थीची गरज नव्हती. 1971 मध्ये सुद्धा अमेरिका सरकारने भारत सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. तो दबाव तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मोडीत काढून पाकिस्तानवर विजय मिळवला होता. पण 2025 मध्ये असे काहीच घडले नाही. पहलगाम येथे हल्ला करणारे दहशतवादी मोकाट फिरत आहेत आणि इकडे भारत सरकारने सीझ फायर केले. किमान त्या चार दहशतवाद्यांना आमच्या ताब्यात द्या, मग आम्ही सीझ फायर करू अशी एखादी तरी अट घातली असती तरी भारतात त्याचा चांगला प्रतिसाद उमटला असता. पण तसे काहीच झाले नाही. अचानक एकाएकी सीझ फायर झाल्यामुळे भारतीय जनता नाराज झाली. आजही त्याच्या प्रतिक्रिया उमटतच आहेत.