आपल्या भारतीय संस्कृतीत वेगवेगळ्या पशूंना, पक्षांना, प्राण्यांना, वनस्पतींना पूजनाच्या प्रथा आहेत. थोडक्यात निसर्गाची उपासना करण्याची ही प्रथा भारतीय संस्कृतीने चांगल्या प्रकारे जोपासली आहे.मात्र या प्रथेतूनच वटपौर्णिमेचा जन्म झाला आणि ती प्रथा आपल्या भारतीय संस्कृतीचा एक भाग झाला.
वटपौर्णिमा म्हणजे काय What is Vat Purnima?
वट म्हणजे वड. वटपौर्णिमा म्हणजे मृग नक्षत्रात येणाऱ्या पौर्णिमेदिवशी वडाच्या झाडाची पूजा करणे होय.
वटपौर्णिमा हा सण स्त्रियांचा झालेला आहे. या सणादिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. निसर्गावर मानवी जीवन अवलंबून असल्याने माणूस निसर्ग पूजा पूर्वापार परंपरेने करत आलेला आहे. त्यातीलच वटपौर्णिमा हा एक भाग आहे. वडाच्या झाडाचे आयुष्य खूप असते. वडाच्या झाडांच्या पारंब्या जमिनीला टेकल्या की तेथून पुन्हा नवीन वृक्ष तयार होतो. त्यामुळे वडाच्या झाडाचे आयुष्य हे खूप मोठे असते . त्याच्या पारंब्या तोडल्याच नाहीत तर त्याचा कधीही अंत होत नाही. या वडाच्या झाडाच्या वेगळ्या वैशिष्ट्यामुळे ते झाड अमर आहे असे म्हटले जाते. त्यातूनच पुढे अशी प्रथा पडत गेली की वडाच्या झाडाप्रमाणे आपल्या पतीला आयुष्य लाभो. असे स्त्रिया मानू लागल्या आणि त्याप्रमाणे मनोकामना करू लागल्या. खरे तर या प्रथेतून आता वेगवेगळ्या नव्या नव्या कथा घुसवून या प्रथेला एक धार्मिक रूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
वडाचे झाड म्हणजे प्राणवायूची फॅक्टरी- Banyan tree is factory of Oxygen
वडाचे झाड हे उत्तम प्राणवायू निर्माण करणारे झाड आहे. पूर्ण वाढ झालेल्या वडाच्या झाडापासून प्रतिदिन 712 किलोग्रॅम प्राणवायूची निर्मिती होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्राणवायूचे निर्माण करणारा वड हा एक दुर्मिळ वृक्ष आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने वडाच्या झाडाला खूप महत्त्व आहे. वडाच्या झाडाखाली उन्हाळ्यातही सावली आणि गारवा असतो. वडाचे झाड हे सदाहरित असल्याने सदा सर्वकाळ हिरवेगार असते.त्यामुळे वडाच्या झाडाचे महत्व अनन्य साधारण असे आहे. त्याच्यातील प्राणवायूच्या क्षमतेमुळेच वडाला पूजा करण्याचा मान मिळालेला आहे. वडाची झाडे लावा. ती जगवा आणि त्या झाडांची पूजा करा. तेच खरे आपले रक्षक आहेत. वडाच्या झाडाची पूजा करण्यामागे त्याची प्राणवायू निर्माण करण्याची क्षमता हेही एक महत्त्वाचे कारण आहे. हे लक्षात ठेवा.
वटपौर्णिमेची कथा: Story of Vat purnima
प्राचीन काळात सावित्रीने वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीला जिवंत केल्याच्या कथा आहे. पण अशा प्रकारे कोणत्याही वनस्पतीची पूजा करून कोणताही मृतवत प्राणी किंवा मनुष्य जिवंत करता येत नाही हे विज्ञान सांगते. या कथा बाजूला ठेवल्या तर वटपौर्णिमा हा सण एक निसर्गाची उपासना म्हणून पाहिले तर त्या सणाचा खरा आनंद घेता येईल.
वट पौर्णिमेचा उपवास Vat purnima Upvas
वटपौर्णिमेचा सण साजरा करताना जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून स्त्रिया या दिवशी उपवास करतात. त्या उपवासाला काही अर्थ नाही. उपवास केल्याने पित्त वाढते. आणि उलट आपल्या शरीराला त्रास होतो. त्यामुळे उपवास करताना आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी स्त्रियांनी घेतली पाहिजे. वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास करावाच असे काहीही नाही. वट पौर्णिमा ही एक निसर्ग पूजा आहे. असे समजून वडाच्या झाडाची पूजा करावी.