Election Commission: महाराष्ट्र विधानसभा निकालावरून राहूल गांधी यांचे निवडणूक आयोगास पुन्हा आव्हान

बिहार आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहूल गांधी यांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगावर आरोप केले आहेत.काही प्रश्न उपस्थित केले आहेत.जशी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या आकडेवारीत अफरातफर झाली, तशीच अफरातफर बिहार आणि पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीची होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राहूल गांधी यांनी निवडणूक आयोगास एक लेख लिहून काही महत्त्वपूर्ण आकडेवारीची माहिती मागवली आहे.

राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावरील लेख 21 भाषांमध्ये प्रसिद्ध :Rahul Gandhi’s article on Election Commission published in 21 languages

राहुल गांधी यांनी 2024 साली झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक काही प्रश्न विचारलेले आहेत त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाने द्यावेत अशी त्यांनी लिहिलेल्या लेखात मागणी केलेली आहे.हा त्यांचा लेख भारतातील जवळजवळ एकवीस भाषांमध्ये आणि भारतातील बहुतांश वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेला आहे. या लेखामुळे संपूर्ण भारतभर निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभाराबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. राहूल गांधीनी जे काही प्रश्न विचारले आहेत त्याची आणि जी काही माहिती निवडणूक आयोगाने वेळेत दिली नाही तर निवडणुका आयोग भारतीय जनतेसमोर आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार आहे.

राहुल गांधी यांचे निवडणूक आयोगाला प्रश्न :Rahul Gandhi’s questions to the Election Commission

राहूल गांधी यांनी निवडणूक आयोगास खालील प्रश्न विचारले आहे आणि त्याची माहिती मागितली आहे.

1. 2005, 2009,2014, 2019,2024 या पाच निवडणुकांमध्ये प्रत्येक वेळी दारांची किती संख्या वाढली आणि त्याची टक्केवारी किती होती चे सविस्तर द्यावी.

2. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पाच महिन्यानंतर झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत किती मतदार वाढले? त्याची टक्केवारी किती?

3. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानापेक्षा पाच महिन्यांनी झालेल्या विधानसभा मतदार संघाच्या विविध नवीन 76 लाख मतदार आले कोठून?

4. 2024 च्या लोकसभेची मतदार यादी द्यावी. तसेच त्यानंतर पाच महिन्यानंतर झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदार यादी द्यावी.

5. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत पाच महिन्यात वाढलेल्या 76 लाख मतदारांची यादी द्यावी.

6. महाराष्ट्र विधानसभा मतदानाच्या वेळी सायंकाळी पाच नंतर 76 लाख मते नोंदली गेली.त्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून द्यावेत.

इत्यादी अनेक प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाला द्यावी लागणार आहेत त्यामुळे निवडणूक आयोग अडचणीत आले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पाच महिन्यात नवीन 76 लाख मतदारांची नोंद झाली. ही बाब संशयास्पद आहे.

प्रश्न विचारले निवडणूक आयोगाला उत्तर देत आहे भारतीय जनता पार्टी

भारतीय लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारले आहेत. पण त्या प्रश्नांची उत्तरे थेट निवडणूक आयोग न देता भारतीय जनता पक्षातील अनेक नेतेमंडळी आणि कार्यकर्ते हेच उत्तरे देत आहेत. ही बाब खूप दुर्दैवाची आणि गंभीर आहे. खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी लेख लिहून राहुल गांधी यांच्या प्रश्नाला उत्तरे देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांची भूमिका ही संशयास्पद वाटत आहे. निवडणूक आयोगाच्या या भोंगळ कारभारावर सर्वोच्च न्यायालयाने आळा घालायला हवा.

Leave a comment