पावसाळा सुरू झाला की पावसात भिजण्याची मौज काही औरच असते. त्याचबरोबर पावसाळ्यात अनेक ठिकाणी फिरायला जावेसे वाटते; पण पावसाळ्यात काही ठिकाणी भेट देण्यास बंदी आहे, हे तुम्हास माहीत आहे का? जाणून घ्या अधिक माहिती.
गडकोट किल्ले :Gadkot Fort
पावसाळ्यात अल्हाददायक वातावरण असते आणि अशा वातावरणात गडकोट किल्ले पाहण्याचा मोह होणे साहजिकच आहे. पण महाराष्ट्रात काही अवघड गडकोट किल्ले आहेत किंवा ज्या गडकोट किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणात धुके आणि मोठ्या प्रमाणात पाऊस असतो, अशा गडकोट किल्ल्यांवर जाण्यास सरकारने बंदी घातलेली आहे. पावसाळ्यात धोका निर्माण होऊ शकतो. अचानक गडावरून पावसाचे पाणी गड चढणाऱ्या वाटेवरून येऊ शकते. वादळ येऊ शकते. धुक्यातून रस्ता नीट दिसत नाही. त्यामुळे कोणताही धोका पत्करण्यापेक्षा पावसाळ्यात रायगड , प्रतापगड, राजगड अशा अनेक अवघड गडांवर जाण्यास टाळावे. पर्यटकांनी अशा गडांकडे पावसाळ्यात फिरू नये.
धबधबे: Falls
पावसाळ्यात महाराष्ट्रातील आणि भारतातीलही धबधबे मोठ्या प्रमाणात वाहू लागतात. खळखळणारे धबधबे आपले लक्ष वेधून घेतात. धबधब्यांना पाहण्याचा मोह आपण आवरू शकत नाही.पण अशा धबधब्यांमध्ये घुसणे धोक्याचे असते धबधब्यांचे पाणी केव्हाही वाढू शकते किंवा धबधब्यातून दगड गोटे येऊन आपल्या डोक्यावर पडू शकतात आणि मोठा आघात होऊ शकतो. म्हणून पावसाळ्यात जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस असतो तेव्हा महाराष्ट्रातील,भारतातील कोणत्याही धबधब्यावर जाण्यास सरकारने बंदी घातलेली आहे. पावसाचा जोर कमी झाल्यास धबधबे खुले होतात. अशा वेळी धबधब्याला फिरण्यासाठी जावे.
अभयारण्य आणि जंगले: Sanctuaries and forests
पावसाळ्यात बहुतांश अभयारण्य बंद असतात 1 ते 31 ऑक्टोबर पर्यंत दरवर्षी अभयारण्य बंद असतात. अशावेळी अन्य कोणत्याही मार्गाने आपण अभयारण्यात फिरायला जाऊ नये. कारण घनदाट जंगलात आणि वाढलेल्या गवतातून आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो.
घाट माथा: Ghatmatha
पावसाळ्यात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याची शक्यता असते, अशा घाटमाथ्यावर किंवा घाटातून जाण्यास पावसाळ्यात बंदी घातलेली असते. अशा ठिकाणी मुद्दामहून जाऊन संकट ओढवून घेऊ नये.
महापूर: Flood
पावसाळ्यात अनेक नद्यांना मोठ्या प्रमाणात महापूर येतो. असे महापूर पाहण्याचे वेड आपल्या मनात घेऊ नये. कारण महापुराच्या ठिकाणी अनेक धोके निर्माण होऊ शकतात. काही लोकांना महापुरातून पोहण्याचाही छंद असतो; पण अशावेळी अनेकांना जीव गमवावा लागलेला आहे. त्यामुळे महापूर पाहण्यासाठी जाताना आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे किंवा दूरूनच महापूर पाहिला पाहिजे.
पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लोणावळा आणि मावळ तालुक्यातील काही पर्यटनस्थळी बीएनएसएस कलाम १६३ लागू केले आहे ती ठिकाणे पुढीलप्रमाणे:
- पावन डॅम
- टायगर पॉईंट
- भाजे धबधबा
- भाजे लेणी
- लोहगड किल्ला
- विसापूर किल्ला
- तिकोना किल्ला
- कार्ला लेणी
- लायन्स पॉईंट
- शिवलिंग पॉईंट
ही पर्यटनस्थळांवरची बंदी 7 जून ते 31 ऑगस्ट पर्यंत लागू असणार आहे