3000 rupees annual toll pass? Is the plan really beneficial?तीन हजार रुपयात मिळणार वार्षिक टोल पास?खरंच हा पास फायदेशीर आहे का?

वाहनांवर आकारल्या गेलेल्या टोल बद्दल वाहतूकदारांची नेहमीच तक्रार राहिलेली आहे. वाहन खरेदी करत असताना रोड टॅक्स, वाहन टॅक्स, जीएसटी इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स वाहनांवर लादून आधीच वाहनधारकांचे कंबरडे मोडलेले आहे. त्यामुळे या टोलचा त्रास वाहनधारकांना खूपच होतो. या पार्श्वभूमीवर केंद्रीय महामार्ग व रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी तीन हजारात वार्षिक पास मिळणार अशी घोषणा केली. काय आहे सत्य या घोषणेमागे? जाणून घेऊया अधिक माहिती.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची टोलबाबत घोषणा :Union Roads and Highways Minister Nitin Gadkari announced the annual toll pass*

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवार दिनांक 18 जून 2025 रोजी टोलबाबतचे नवे धोरण जाहीर केले. या धोरणानुसार तीन हजार रुपयात वाहनधारकांना वार्षिक पास मिळणार आहे. 15 ऑगस्ट 2025 पासून ही नवीन योजना कार्यान्वित होईल असे नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. वाहनधारकांना या पासचा उपयोग जास्तीत जास्त एका वर्षात दोनशे वेळा करता येईल. त्यापेक्षा जास्त फेऱ्या मारल्यास त्याचा टोल भरावा लागणार आहे. म्हणजे नियमित आणि जास्तीत जास्त टोलचा वापर करणाऱ्या वाहनधारकांसाठी ही योजना अत्यंत चांगली आहे; पण असे वाहनधारक किती आहेत? देशातील सर्व वाहनांचा विचार केल्यास महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात सरासरी दहा टक्के सुद्धा वाहनधारक 200 वेळा किंवा त्यापेक्षा जास्त वेळेस टोलचा वापर करणारे नसतील. हा लाभ केवळ नियमित टोल ओलांडणाऱ्या वाहनधारकांनाच होईल. त्यापेक्षा कमी फेऱ्या मारणाऱ्या लोकांसाठी ही योजना फायदेशीर नाही. म्हणजे ही योजना केवळ फुसका बार आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. केवळ बिगर व्यावसायिक कार किंवा जीप ला या योजनेचा फायदा होईल की जे नियमित जास्तीत जास्त टोल ओलांडतात.

एसटी बसेसच्या टोल फ्रीचे काय? What about toll exemption for ST buses?

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या किंवा अन्य राज्य परिवहन मंडळाच्या बसेस नेहमी राज्य महामार्गावरून फेऱ्या मारत असताना टोल भरतात. राज्य परिवहन मंडळ तोट्यात असतानाही राज्य सरकार त्यांना साधा टोल सुद्धा माफ करत नाही. ही बाब खूप दुर्दैवाची आहे. संपूर्ण देशातच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना टोल फ्री व्हायला हवा . तरच ही महामंडळे अधिक चांगल्या गतीने चालेल. इतर अनेक ठिकाणी वारेमाप पैसा खर्च केला जातो; पण टोलच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जात नाही ही बाब दुर्दैवाची आहे.

वार्षिक टोल पास कुठे मिळेल? Where to get Annual Toll Pass?

देशातील संपूर्ण वाहनधारकांना वार्षिक टोल पास कुठे मिळेल? हा प्रश्न पडलेला असेल. निश्चितच या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळेल. राष्ट्रीय महामार्गावरील कोणत्याही टोल नाक्यावर वाहनधारकांना हा वार्षिक टोल पास मिळेल. ज्या वाहनधारकांचा जुना फास्ट टॅग आहे, त्याच फास्ट टॅगवर नवीन वार्षिक टोल पास मिळेल. त्यासाठी वेगळा फास्ट टॅग काढायची गरज नाही.

नवीन वार्षिक टोल पास कुणासाठी आहे? Who is the new annual toll pass for?

सर्वच वाहनधारकांना हा प्रश्न पडला आहे की या नव्या योजनेचा फायदा कुणाकुणाला आहे? खरे तर ही नवी योजना फक्त खासगी कार्स, बिगरव्यावसायिक कार्स, जीप, व्हॅन यांच्यासाठीच आहे. त्यामुळे अन्य वाहनधारकांना याचा फायदा होणार नाही. मग ही योजना काय कामाची आहे आणि असा दररोज टोलचा वापर करणारे आणि 200 फेऱ्या मारणारे वाहनधारक खूपच कमी आहेत.त्यांनाच हा फायदा होणार आहे.

*देशात तीन हजाराचा पास काढणारे किती टक्के लोक आढळतील? How many vehicle owners are there in the country who can get a Rs 3000 pass?*

संपूर्ण भारत देशाचा विचार केल्यास दिल्ली मुंबई, कोलकाता, चेन्नई इत्यादी शहरातील वाहनधारकांना या नवीन तीन हजार रुपयांच्या टोलच्या पासचा उपयोग होईल असे वाटते .अन्य वाहनधारकांना याचा फारसा उपयोग होणार नाही. संपूर्ण देशात सरासरी पाच टक्के ते दहा टक्केच लोक वार्षिक पास काढतील आणि त्यांनाच या नव्या धोरणाचा फायदा होईल.अनेक वाहनधारक टोल भरून बुर्दंड सहन करत बसतील.

समृद्धी महामार्ग, पुणे-मुंबई जलद एक्सप्रेस येथे पास चालणार का?

समृद्धी महामार्ग,राज्य महामार्ग, पुणे- मुंबई चलद एक्सप्रेस महामार्ग या महामार्गांवर तीन हजार रुपयांचा पास चालणार नाही. मग या पासचा काय उपयोग? हा केवळ फसवा फतवा आहे, असे म्हणता येईल किंवा काही ठराविक वाहनधारकांच्या हिताचा आहे असे म्हणता येईल.

Leave a comment