भारत हा देश विकसित देशांच्या यादीत बसत नसला तरी AI तंत्रज्ञान अंतर्गत चाट जीपीटी या तंत्राचा सर्वाधिक वापर करणारा जगातील एकमेव देश आहे. यामध्ये 18 ते 30 वर्षातील मुलांनी अधिकाधिक Chat-GPT चा वापर केलेला आहे. चॅट जीपीटीच्या माध्यमातून अवघडातील अवघड प्रश्नाचा उकल झटपट होतो. त्यामुळे मुलांना सहज आणि सुलभपणे ज्ञान मिळते ;पण चाट-जीपीटीद्वारे मिळालेले प्रत्येक उत्तर हे बरोबर असतेच असे नाही. त्यामुळे मुलांनी पुस्तकरूपी ज्ञानाचा वापर करून आपले ज्ञान पक्के करावे. असा सल्ला देण्याची आता वेळ आली आहे.