श्री क्षेत्र जोतिबाः वाडी रत्नागिरी, कोल्हापूर: Jotiba Temple, Kolhapur Wadi Ratnagiri

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात वाडी रत्नागिरी गावाच्या उंच टेकडीवर जोतिबाचे मंदिर वसलेले आहे. जोतिबाला दख्खनचा राजा असे संबोधले जाते. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वांत जास्त भाविक हे जोतिबाच्या दर्शनासाठी येतात. दख्खनचे आणि कोल्हापूरचे वैभव असलेल्या या जोतिबाला एकदा तरी जाऊन यावे असेच हे मंदिर आहे. जोतिबाला ज्योतिबा असेही म्हणतात. या जोतिबाब‌द्दल आणि जोतिबाच्या मंदिराब‌द्दल आपण अधिक … Read more

रविंद्रनाथ टागोर / Rabindranath Tagore

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 7 में 1861 मध्ये कोलकाता येथील जोराशंका ठाकूर बाडी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव देवेंद्रनाथ होते. तर आईचे नाव सरला (शारदादेवी) होतेः देवेंद्रनाथ आणि शारदादेवी यांचे 13 वे अपत्य म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर होय. वयाच्या बाराव्या वर्षी म्हणजे 1973 साली त्यांनी वडिलांसोबत भारत भ्रमंती करण्यास सुरुवात केली. या काळात त्यांनी … Read more

मराठी वाङ्मय:परिचय /Ancient Marathi literature

1 प्राचीन मराठी वाङ्मय : * मुकुंदराज : मराठीचे आद्य कवी, ग्रंथ विवेकसिंधू, मूलस्तंभ * संत ज्ञानेश्वर : ग्रंथ – भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठ, अभंगगाथा. * संत नामदेव : ग्रंथ नामदेवाचे अभंग, शीखांचा धर्मग्रंथ गुरू ग्रंथसाहेब यात रचना. * संत एकनाथ : ग्रंथ चतुःश्लोकी भागवत, एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर, भारुडे, गवळणी, … Read more

शिक्षक दिन विशेषांक /Teachers’ Day

माझ्या प्रवासातील सोबती माझे आईवडील शेतकरी कुटुंबातील,कष्टाळू, समाजप्रिय आणि प्रामाणिक असे लाभल्यामुळे माझे व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी बालपणीच या गोष्टींचा प्रभाव पडला होता.माझ्या कष्टाळू वडिलांनी आपल्या नऊ मुलांबरोबरच भावकीतील मुलांचेही संगोपन केले.उसाच्या घाण्यावर chief chemist (मुख्य गुळव्या) असलेल्या माझ्या बाबांचा सहवास मला अल्पकाळ लाभला. मी त्यांचा लाडका होतो.भल्या पहाटे नदीला, विहिरीला अंघोळीला सहा जण भावांपैकी मी एकटाच … Read more

पर्यावरण दिन / Environment day

5 जून हा पर्यावरण दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो.खरं तर केवळ एक दिवस पर्यावरण दिन साजरा करून काहीच उपयोग होत नाही.त्यामुळे पर्यावरणाचे पर्यायाने संपूर्ण जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पर्यावरणाचा दिवसेंदिवस ऱ्हास होत आहे.पर्यावरणाबाबत जागृती खूप होऊनही म्हणावी तशी अंमलबजावणी झालेली नाही. ध्वनिप्रदूषण,हवा प्रदूषण, जमीन प्रदूषण, जलप्रदूषण आणि अन्नप्रदूषण सुद्धा अलीकडे खूप वाढत … Read more

मुले, शाळा आणि गृहपाठ/Children, school and homework

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी काही महिन्यांपूर्वी मुलांना पुरेशी झोप मिळत नाही,याकडे राज्यशासन, शिक्षण विभाग आणि शिक्षक यांचे लक्ष वेधले आहे.याबाबत राज्यपालांनी दोन बाबींकडे लक्ष वेधून घेतले आहे 1.शाळांच्या वेळा 2. मुलांना दिला जाणारा अभ्यास(गृहपाठ)होय. खरे तर मुलांच्या मानसिक स्थितीवर त्यांचा बौद्धिक, भावनिक आणि शारीरिक विकास अवलंबून असतो.म्हणूनच मुलांच्या मानसिक स्थितीवर कोणताही परिणाम होणार नाही,याचा … Read more

कॅन्सरमुक्त भारत:एक अभियान (Reasons of cancer)

भारत हा मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार आणि कॅन्सर यांसारखे आजार असलेला देश अशी ओळख निर्माण होऊ नये म्हणून आरोग्याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे.अलीकडे भारतात मोठ्या प्रमाणात कर्करोग (कॅन्सर)वाढत आहे . कॅन्सर हा आजार शंभर टक्के बरा होण्याची सुविधा सध्या तरी या विश्वात अस्तित्वात नाही . म्हणून रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये म्हणून दक्षता घेणे … Read more

मीठ(salt)/Rock salt

मीठ हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे. रोजच्या जेवणात मीठ ही एक अत्यावश्यक बाब मानली जाते. मीठ नाही असे घर मिळणार नाही. मिठाला सोडिअम क्लोराइड या रासायनिक नावाने ओळखतात. तर NaCl ही मिठाची रासायनिक संज्ञा आहे. या मिठाचे महत्त्व, फायदे-तोटे, मिठाचे वेगवेगळे प्रकार याबाबत अधिक माहिती या लेखातून आपण घेणार आहोत. मीठ आणि आपले … Read more

आकाश निळे का दिसते?/Why does the sky look blue?

सूर्यप्रकाशात तांबडा,नारिंगी,पिवळा, हिरवा,निळा, पारवा,जांभळा असे सात रंग असतात. या सात रंगांपासून सूर्यप्रकाश तयार होतो. सूर्यप्रकाशातील लाल रंगाच्या प्रकाशाची तरंग लांबी निळ्या रंगाच्या प्रकाशाच्या तरंग लांबीपेक्षा 1.8 पटीने जास्त असते.जेव्हा सूर्यप्रकाश वातावरणातून जात असतो ,तेव्हा हवेतील सूक्ष्मकण लाल रंगापेक्षा निळा रंग अधिक तीव्रतेने विकीरण करतात. त्यामुळेच आकाशात सगळीकडे निळा रंग पसरतो.म्हणूनच आकाश निळ्या रंगाचे दिसते. विकीरण: … Read more

रानभाज्या/Ran bhaji

रानभाज्यांचे आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. रानभाज्या खा आणि दीर्घायुषी व्हा. असे म्हटले जाते ते रानभाज्यांच्या ठिकाणी असलेल्या प्रचंड ऊर्जाक्षमता आणि रोगप्रतिकारक शक्तीमुळेच.धरतीमातेने आपल्याला मोफत दिलेले वरदान म्हणजे रानभाज्या’ होय. म्हणूनच पावसाळ्यात रानावनात विपुल प्रमाणात सहज आणि फुकट उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांचा आस्वाद आबालवृद्‌धांनी घेतला पाहिजे .या रानभाज्यांची अधिक माहिती आपण घेणार आहोत. भाज्यांचे प्रकार: सर्वसाधारणपणे … Read more