वास्तुशैलीचा विकास :
• चबुतऱ्यावर बांधलेल्या वास्तू, नक्षीदार कमानी, घोटीम घुमट, जाळीदार नक्षी इत्यादी आशियाई वास्तुकलेची वैशिष्ट्ये होती.
• दिल्ली येथील कुतुबमिनारचे बांधकाम कुतुबुद्दीन ऐबकच्या काळात सुरू झाले.
• अल्तमशने कुतुबमिनारचे बांधकाम पूर्ण केले.
• गुलबर्गा येथील जामा मशीद बहमनी राजवटीत स्थापन झाली.
• विजापूर येथे महंमद आदिलशाहाने गोलघुमट बांधला.
• कोणार्क येथील सूर्य मंदिर तेराव्या शतकातील आहे.
• विजयनगरमधील हजार राम मंदिर व विठ्ठल मंदिर प्रसिद्ध आहेत.
*रेखाचित्र:
• सुलतानशाहीच्या काळात अरबांनी भारतात प्रथमच कागद आणला
• या काळात जैन ग्रंथकारांनी कागदावर ग्रंथ लिहिले.
• चित्रांमध्ये इराणी शैलीचे अनुकरण होऊ लागले.
*संगीत:
• गोपाळ नायक व अमीर खुसरो या दोघांनी संगीताचा पाया घातला.
• भजने, कवने, कव्वाली इत्यादी काव्यप्रकार उपयोगात आणले.
• अमीर खुसरो याने भारतीय वीणा व इराणी तंबोरा यांच्या एकत्रीकरणातूर ‘सतार’ हे तंतूवाद्य बनवले.
*वाङ्मय :
• विज्ञानेश्वर – मिताक्षरा
• अमीर सुखरो – शिरी खुसरौ
• अमीर खुसरो – ऐन-इ-सिकंदरी
• मुकुंदराज – विवेक सिंधू
•म्हाईंभट- लीळाचरित्र
• संत ज्ञानेश्वर – भावार्थदीपिका
*भक्ती संप्रदाय :
• ईश्वरप्रेम, माणुसकी, भूतदया, करुणा इत्यादी मूल्यांची जोपासना भक्ती संप्रदायामुळे झाली.
• ईश्वर जात-पात ओळखत नाही- रामानंद.
• जातिभेद, धर्मभेद कृत्रिम आहेत- संत कबीर.
• कर्नाटकात बसवेश्वरांनी वीरशैव पंथाची शिकवण दिली.
• स्त्रिया व दलितांना मानाचे स्थान बसवेश्वर.
• पुरंदरदास यांचे कन्नड भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
• महाराष्ट्रातील संतांनी ईश्वरप्रेम, भूतदया, समानता इ.ची शिकवण दिली.
• गुरु नानकांनी कर्मकांडाला थोतांड मानले.
‘जो सर्वांना समत्वाने वागवेल आणि भ्रष्ट जगात निर्मळ राहील तोच खरा धर्म’ अशी गुरूनानक यांनी शिकवण दिली.
• स्त्री हाच मानवसृष्टीचा मूलाधार आहे- गुरूनानक.
• गुरूनानकांनी शिष्यांना केलेला उपदेश आदिग्रंथ.
• आदिग्रंथ (ग्रंथसाहेब) हा शिखांचा पवित्र ग्रंथ होय.