2025 सालचा उन्हाळा हा प्रत्येकालाच त्रासदायक ठरला.याचे कारण म्हणजे या उन्हाळ्यात प्रचंड उष्णता जाणवली. दरवर्षी तापमान वाढ होत आहे याचा हा परिणाम आहे.हे तापमान असेच वाढत राहिले तर उष्माघातासारखे आजार निश्चितच वाढणार आणि त्यातून माणूसच काय इतर प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होणार हे अगदी सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ आहे.
येत्या पाच वर्षात दीड टक्के तापमान वाढणार :Temperature will rise by 1.5% in next five years
तापमान वाढीचा प्रश्न हा केवळ भारतापुरता मर्यादित नाही. संपूर्ण जगाचेच तापमान वाढणार आहे. माणसाने निसर्गावर केलेला आघात आणि माणसाने स्वतःहून निर्माण केलेल्या अनेक समस्या यातून जागतिक तापमान वाढ दिवसेंदिवस होत आहे. 2026 ते 2030 या पाच वर्षात पृथ्वीवरचे तापमान दीड टक्क्याने वाढण्याची शक्यता आहे. आणि हेच तापमान जर असेच वाढले तर माणसाच्या जीवावर बेतणार. इतर प्राण्यांच्या जीवावर बेतणार. जैवविविधतेला धोका निर्माण होणार. अशा अनेक समस्या निर्माण होणार आणि त्याला कारण म्हणजे हे वाढलेले तापमान असणार आहे.
तापमान वाढीमुळे काय परिणाम होतील? What will be the consequences of global warming?
1 नजीकच्या पाच वर्षात 1.5 अंशाने किंवा त्यापेक्षा अधिक तापमान वाढल्यास निश्चितपणे संपूर्ण जगामध्ये उष्णतेचे तीव्र लाट येईल. अनेकांचा उष्माघाताने मृत्यू होईल. अनेकांना उपचार करायला सुद्धा वेळ मिळणार नाही.
2 ह्या वाढलेल्या तापमानाचा परिणाम म्हणून आकस्मिक नैसर्गिक आपत्ती कोसळणार. महापुरासारखे प्रश्न वारंवार निर्माण होणार. काही ठिकाणी दुष्काळ पडणार. अचानक येणारी चक्रीवादळे मोठ्या प्रमाणात नुकसान करून जाणार. जंगलातील आग लागण्याचे प्रमाण निश्चितच वाढणार.या तापमान वाढीचा फटका अशा अनेक बाबींवर पडणार.
2 तापमान वाढीमुळे हिमालयासारख्या ठिकाणी असलेल्या बर्फांचे वितळणे वाढणार. आणि त्याचा फटका म्हणून समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणार आणि समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे समुद्र काठाला असणाऱ्या अनेक गावांना जलसमाधी मिळणार. ही गावे पाण्यात पूर्णपणे बुडून जाणार हे निश्चित आहे.
तापमान वाढीमुळे आर्थिक मंदी येणार: Rising temperatures will cause an economic recession
जागतिक तापमान वाढीचा फटका सर्वच घटकांवर बसणार आहे, तसा अर्थव्यवस्थेलाही बसणार आहे. तापमान वाढीमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होणार आहेत. जगामध्ये आर्थिक मंदीची लाट येण्याची शक्यता आहे. माणसाने अजूनही सावध झाले तर या तापमान वाढीवर आजपासूनच उपाययोजना करायला सुरुवात झाली पाहिजे तरच जगाची यातून सुटका होईल.