Corona Vaccine- कोरोना लसीने अचानक हृदयविकार?

सध्या भारतात अनेक धडधाकड तरुणांमध्ये आणि प्रौढ व्यक्तींच्या मध्ये अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. ही स्थिती संपूर्ण भारतातच असल्याने याबाबत केंद्रशासनाने संशोधन समिती नेमणूक अहवाल सादर केला. पण हा अहवाल कितपत सत्य आहे ? अन्य काही देशांमध्ये सुद्धा कोरोना लसीबाबत काय निष्कर्ष काढले? याबाबत अधिक माहिती आपण जाणून घेऊया. भारतात अचानक हृदयविकाराच्या … Read more

Princess Ratnavati Girl’s School – राजस्थानच्या वाळवंटातील अद्भुत शाळा तिच्या अद्भुततेत काय दडले आहे? जाणून घेऊया अधिक माहिती.

जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी सुंदर आकर्षक सर्व सुविधायुक्त अनेक शाळा पाहायला मिळतात. पण राजस्थान मधील ही अनोखी शाळा आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. काय आहे ही नेमकी शाळा? राजकुमारी रत्नावती गर्ल्स स्कूल- भारतातील राजस्थान राज्यांमध्ये हळदी वाळवंटामध्ये वसलेली उत्तम दर्जाची नैसर्गिक वातावरण लाभलेली शाळा म्हणजे राजकुमारी रत्नावती गर्ल्स स्कूल होय. ही शाळा जैसलमेरच्या वाळवंटात वसलेली … Read more

What causes milk to go sour?-दूध उतू जाते, यामागे नक्की काय कारण आहे जाणून घ्या एका क्लिकवर  

दुधामध्ये प्रामुख्याने तीन प्रकारची प्रथिने असतात. ही तीन प्रकारची प्रथिने म्हणजेच केसिन, अल्फा अल्ब्युमिन आणि बीटा ग्लोब्युलीन होय. दुधाला उष्णता दिल्यानंतर हळूहळू दूध तापू लागते. दुधाचे तापमान जेव्हा वाढते तेव्हा दुधात असलेल्या पाण्याचे बुडबुडे तयार होऊ लागतात. या बुडबुड्यांभोवती दुधात असलेल्या प्रथिनांचे थर जमा होतात. त्यामुळे हे बुडबुडे दुधात फुटत नाहीत. जेव्हा उष्णता वाढत जाते … Read more

Ancient Cave Mahableshwer-महाबळेश्वरमधील एलिफंट हेडच्या अगदी पायथ्याशी असलेली एक छोटीशी गुहा तुम्ही पहिली आहे का ?

महाबळेश्वरमधील एलिफंट हेडच्या अगदी पायथ्याशी वयगाव गावापासून दोन किलोमीटर अंतरावर एक छोटीशी गुहा आहे. या गुहेशेजारील एक छोटासा धबधबा आहे.या गुहेच्या परिसरातील वातावरण अल्हाददायक आहे. पावसाळ्यात हा परिसर पाहण्याचा आनंद लुटण्यास हरकत नाही.

या गुहेबाबत महाबळेश्वर परिसरात अनेक आख्यायिका आहेत. ही गुहा पांडवकालीन असल्याचे म्हटले जाते. दुसरी गोष्ट म्हणजे महाबळेश्वरच्या पायथ्याशी म्हणजे एलिफंट हेडच्या पायथ्याशी वयगाव हे दोन हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावात कातकरी हे आदिवासी लोक राहतात.फार वर्षांपूर्वी म्हणजे अश्मयुगात कातकरी लोक या गुहेत राहत असत आणि ही गुहा त्यांनीच खोदून काढलेली आहे असेही म्हटले जाते.

सम्राट अशोक काळात म्हणजे मौर्यकाळात औषधी वनस्पती पासून औषधे बनवण्यासाठी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती मिळतात अशा ठिकाणी औषधी वनस्पतींपासून आयुर्वेदिक औषधे करण्याचे काम केले जात असे. या गुहेत गेल्यानंतर इथे बारकाईने निरीक्षण केले असता अनेक ठिकाणी औषधे चेचण्यासाठी आवश्यक असलेली व्हाण(खोलगट जागा)येथे पाहायला मिळतात. त्यामुळे ही गुहा मौर्यकालीन असावी असे वाटते.

Krishna River – कृष्णेच्या उगमाच ठिकाण तुम्हाला माहितीये का?पाहा विडिओ

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील महाबळेश्वरच्या जोर परिसरातील कृष्णा नदीच्या अगदी उगमाजवळील खळाळत्या पाण्याचे हे दृश्य आहे. महाबळेश्वरच्या घाटमाथ्यावर कृष्णा नदीचा उगम झाला असे म्हटले जाते;पण प्रत्यक्षात कृष्णेचा उगम हा जोर या गावापासून काही अंतरावरच आहे. हा उगम प्रवाह महाबळेश्वरच्या घाट माथ्यावरून येणाऱ्या अनेक प्रवाहांपेक्षा खूप मोठा प्रवाह आहे. म्हणूनच कृष्णेचे उगमस्थान हे जोर गावापासून … Read more

Public Safety Act-जन सुरक्षा कायदा- लोकशाहीसाठी धोक्याची घंटा? 

सन 2024 पासून सध्याचे विद्यमान सरकार जन सुरक्षा कायदा पाहत आहे. चालू वर्षाच्या पावसाळी (जुलै 2025) अधिवेशनात हा कायदा सरकार पास करून घेण्याचा विचार करत आहे. हा कायदा म्हणजेच लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असेल. जनतेला अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळणारच नाही. तुम्हाला सरकार विरुद्ध आवाज उठवता येणार नाही. आंदोलन करता येणार नाही. जनसुरक्षा कायद्याचा कडक अंमल झाला तर … Read more

Difference between baking powder and baking soda-बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर यातील नेमका फरक काय?

बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर यांमध्ये सूक्ष्म फरक आहे. वरवर पाहता हे दोन्ही पदार्थ एकच आहेत असे वाटते; पण प्रत्यक्षात त्यांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत आणि त्यांचा उपयोगही वेगवेगळ्या कारणासाठी केला जातो. त्या दोन्हीही पदार्थांची ओळख आपण करून घेऊ. बेकिंग सोडा [धुण्याचा सोडा] :Baking soda बेकिंग सोड्यालाच धुण्याचा सोडा असे म्हणतात. बेकिंग सोडा प्रामुख्याने कपडे धुण्याच्या … Read more

Emergency-इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी का आणली होती? 

25 जून 1975 रोजी इंदिरा गांधींनी भारतात आणीबाणी आणली होती. सध्याचे महाराष्ट्रातील विद्यमान सरकार 25 जून हा दिवस संविधानात हत्या दिन म्हणून का साजरा करते? याबाबत आपण सविस्तर चर्चा करू. भारतात आणीबाणी लागू करण्यापूर्वी इंदिरा गांधींनी कणखर भूमिकेने घेतलेले निर्णय- Tough decisions taken by Indira Gandhi before imposing Emergency in India 1971 मध्ये इंदिरा गांधी … Read more

Kolhapur Shakti Peeth-शक्ती पीठला विरोध,कोल्हापूरकर एकवटले

महाराष्ट्र सरकारने नागपूर ते गोवा असा प्रचंड महामार्ग काढण्याचा प्रयत्न चालू केला आहे. या महामार्गाला शक्तिपीठ महामार्ग असे म्हटले जाते. या शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूरकरांनी प्रचंड विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक 1 जुलै 2025 रोजी महामार्ग रोको आंदोलन होणार आहे. कोल्हापूरकरांचा शक्तीपीठला विरोध नागपूर ते गोवा शक्तिपीठ मार्ग काढून कुणाचे हित होणार आहे ? … Read more

Tribhasha Sutra-त्रिभाषा सूत्र नेमके काय आहे ते सविस्तर जाणून घ्या

तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी शिक्षणात परिवर्तन घडवण्यासाठी कोठारी आयोगाची निर्मिती केली. या कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार भारतात त्रिभाषा सूत्र अमलात आले. हे त्रिभाषा सूत्र नेमके काय आहे ते समजून घेऊ. त्रिभाषा सूत्र आणि कोठारी आयोग- Tribhasha Sutra and Kothari Commission कोठारी आयोगाने 1968 साली त्रिभाषा सूत्र अमलात आणण्यासाठी शिफारस केली. अर्थात ही शिफारस होती. … Read more