Poonch Artillery Firing-तिकडे ऑपरेशन सिंदूर यशस्वी, तर इकडे पूंछ भागात पाकिस्तानचा गोळीबार

पहलगाम आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यामुळे पाकिस्तानचा जळफळाट झाला आणि त्यातूनच पाकिस्तानच्या सैन्याने पूंछ भागात नागरी वस्तीत गोळीबार केला हे पाकिस्तानचे भ्याड कुठे आहे. यात 16 नागरिक मृत्युमुखी पडले. त्याचा सविस्तर वृत्तांत पाहू.

22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी चार अतिरेक्यांनी भारतीय पर्यटकांवर बेछूटपणे गोळीबार करून 26 जणांना ठार मारले. त्याचा परिणाम नजीकच्या काळात भारत सरकार दाखवणार याची खात्री होती. म्हणूनच भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर हाती घेतले आणि 7 मे 2025 च्या पहाटे 1 वाजून 05 मिनिटे ते 01 वाजून 30 मिनिटे या 25 मिनिटांच्या कालावधीत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये असणाऱ्या दहशतवादी संघटनांचे अड्डे उध्वस्त केले. भारतीय हवाई दलाने नऊ दहशतवादी अड्ड्यांवर अचूक बॉम्ब फेक करून ही दहशतवादी केंद्रे उद्ध्वस्त केली. हे ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानला काहीच न करण्यापूर्वी यशस्वी झाले. तरीसुद्धा झोपेतून जागे झालेल्या पाकिस्तानने भारताचे पाच हवाई जहाज पाडल्याचे खोटे विधान करून जगामध्ये संभ्रम निर्माण केला. पण सकाळी सात वाजेपर्यंत पाकिस्तानचे पूर्ण पितळे उघडे पडले होते. भारताचे एकही हवाई जहाज पाकिस्तानला पाडता आले नाही. एवढेच नाही तर हवाई हल्ले झाल्यानंतर काही मिनिटांनी पाकिस्तानला जाग आली. एव्हाना भारतीय विमाने परत आपल्या हद्दीत आली होती.

पूंछ भागात नागरी वस्तीत पाकिस्तानचा गोळीबार

7 मे 2025 रोजी पहाटे दीड वाजता भारतीय हवाई दलाचे म्हणजेच भारताचे ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर अर्ध्या तासांनी पाकिस्तानला जाग आली आणि सीमा वरती भागात गोळीबार करायला सुरुवात केली. पाकिस्तानच्या लष्कराचा जळफळाट झाल्याने पाकिस्तानच्या लष्कराने पूंछ भागात पहाटे दोन वाजता गोळीबार करायला सुरुवात केली. अर्थात हा गोळीबार भारतीय लष्करांविरुद्ध नव्हता. हा गोळीबार नागरी वस्त्यांवर होता. त्यामुळे या गोळीबारात एकूण 16 जणांचा मृत्यू झाला. यात लहान मुले सुद्धा आहेत. एक भारतीय जवान सुद्धा या गोळीबारात शहीद झाला. एका नेपाळी नागरिकांचाही या गोळीबारात मृत्यू झाला.

भारतीय लष्कराची खबरदारी

जम्मू काश्मीर येथील पूंछ भागात पाकिस्तानच्या लष्कराने नागरी अवस्थेत गोळीबार सुरू केल्याने भारतीय लष्कराने तातडीने अनेक नागरिकांना खंदकात लपण्यास मदत केली. अनेक नागरिकांचे स्थलांतर केले. काही नागरिक पाळी तर काही नागरिक वाहनातून पूंछ भागातून वेगाने पलायन करत होते. पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबारात किती लोक मृत्युमुखी पडले हे कोणालाच माहीत नव्हते. त्यामुळे नागरिकांच्या मध्ये घबराहट निर्माण झाली होती. भारतीय लष्कराने कोणत्याही प्रकारची नागरी अवस्थेत हानी पोहोचू नये याची पूर्ण काळजी घेतली होती. पण पाकिस्तानने मात्र जाणीवपूर्वक ऑपरेशन सिंदूर चा राग नागरी वस्त्यांवर गोळीबार करून व्यक्त केला होता.

पाकिस्तानचे भ्याड कृत्य

चीन सारख्या देशाच्या चेतावणीमुळे पाकिस्तानने नागरी वस्त्यांवर गोळीबार करण्याचे भ्याड कृत्य केले आहे. कारण पाकिस्तान हा देश स्वयंभूपणे भारताशी केव्हाही लढू शकत नाही .याची जाणीव पाकिस्तानला चांगलीच आहे. 1947 मध्ये, 1965 मध्ये, 1971 मध्ये झालेल्या युद्धात पाकिस्तानचा पूर्ण पराभव झाला होता. याची जाणीव पाकिस्तानला चांगलीच आहे. त्याचबरोबर 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धातही पाकिस्तानचा पूर्ण पराभव झाला होता. त्यामुळे भारतीय लष्कराची शक्ती किती महान आहे ,याची जाणीव पाकिस्तानला चांगलीच आहे.

Leave a comment