How much water should be drink in summer? उन्हाळ्यात किती लिटर पाणी प्यावे?

उन्हाळा हा ऋतू जसा फळा फुलांचा आहे , तसाच तो कडक उन्हाच्या झळींचा आहे. हिवाळा आणि पावसाळा या दोन ऋतूंपेक्षा अनेकांना उन्हाळा या ऋतूचा खूप त्रास होतो. जागतिक तापमान वाढीमुळे संपूर्ण जगात गेल्या दहा वर्षात तापमान वाढीचा वेग खूप वाढलेला आढळून येतो. भारत याबाबतीत अपवाद नाही. म्हणूनच उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे योग्य संतुलन टिकवणे आवश्यक आहे. अन्यथा आपण उष्माघाताचे बळी ठरू शकतो.

How much water should be drink in summer? उन्हाळ्यात किती लिटर पाणी प्यावे?

सर्वसाधारणपणे उन्हाळा या ऋतूत हिवाळा आणि पावसाळा यापेक्षा अधिक पाणी प्यावे लागते. याचे कारण म्हणजे उन्हाळ्यात तापमान वाढीचा वेग खूप जास्त आहे. त्याचा परिणाम म्हणून आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण घामावाटे कमी होते. हे पाण्याचे कमी झालेले प्रमाण भरून काढण्यासाठी आपणास इतर ऋतूंपेक्षा उन्हाळ्यात अधिक पाणी प्यावे लागते.

उन्हाळ्यात पुरुषांनी साडेतीन ते साडेचार लिटर पाणी दिवसभर पिणे आवश्यक आहे. तर स्त्रियांनी अडीच लिटर ते साडेतीन लिटर पाणी प्यावे. गरोदर स्त्रियांनी थोडे अधिक पाणी प्यावे.

शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राहिल्यामुळे किडनी आणि लिव्हर यांच्यावर विपरीत परिणाम होत नाही. अति कमी पाणी पिल्यास मुतखडा होण्याची शक्यता असते. शिवाय असेच पिण्याचे पाणी कमी ठेवल्यास किडनी खराब होऊ शकते. आपल्या त्वचेवर लवकरच सुरकुत्या दिसू लागतात. त्वचेची कांती तजेलदार राहत नाही. म्हणूनच संतुलित पाणी पिणे आवश्यक आहे.

*उन्हाळ्यात खूप पाणी पिल्यास काय होईल?

उन्हाळ्यात आपण गरजेपेक्षा अधिक पाणी प्याल्यास त्याचा आपल्या शरीरास सुपरिणाम होणार नाही, उलट आपल्या शरीराचे नुकसान होईल. अधिक पाणी पिल्यामुळे किडनीवर अतिरिक्त ताण येतो आणि किडनी लवकरच खराब होऊ शकते . म्हणून उन्हाळ्यात सुद्धा योग्य प्रमाणात आणि संतुलित पाणी प्यावे.

*उन्हाळ्यात पाणी थंड प्यावे की गरम?

अनेक लोक कडक उन्हाचा त्रास होतो म्हणून थंड पाणी पितात ; पण हे थंड पाणी आपल्या शरीरास सूट होत नाही. थंड पाणी पिल्यामुळे शरीराचे तापमान अचानक कमी होते. शरीराचे असे अचानक तापमान कमी झाल्यामुळे आपल्याला त्रास होतो. म्हणून उन्हाळ्यात फ्रिज मधील थंड पाणी किंवा बिसलरी मधील सुद्धा थंड पाणी पिऊ नये. नेहमी नॉर्मल तापमानाचे पाणी प्यावे. त्याचा आपल्याला अजिबात त्रास होणार नाही. उलट असे पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरास आराम मिळतो.

*उन्हाळ्यात कोल्ड ड्रिंक प्यावे का?

उष्णतेचा त्रास जाणू लागला की अनेक लोकांची पावले कोल्ड्रिंक हाऊसकडे वळतात. पण उन्हाळ्यात कोणत्याही प्रकारचे कोल्डड्रिंक घेऊ नये. त्याचा आपल्या शरीरास खूप विपरित परिणाम होतो. सर्दी, कफ असे आजार होऊ शकतात. म्हणून उन्हाळ्यात कोणत्याही प्रकारचे आणि कसलेही कोल्ड ड्रिंक घेऊ नये. ते आपल्या आरोग्यास हितकारक नसते.

*उन्हाळ्यात कोणते द्रव पदार्थ घ्यावेत?

उन्हाळ्यात आपल्याला उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून ताक, ताकापासून बनवलेली आंबील, नाचणीच्या पिठापासून बनवलेली आंबील, आंब्यांपासून बनवलेले पन्हे , लिंबू पाणी, लिंबू सरबत आणि तोही नॉर्मल पाण्यातील असे पदार्थ उन्हाळ्यात सेवन केल्यास शरीरास पोषक ठरतात .थंड ताक किंवा थंड दही किंवा थंड लस्सी असे पदार्थ घेऊ नयेत.

Leave a comment