प्राचीन भारत-:
वैदिक काळात वर्णव्यवस्थेमुळे समाजात उच्च-नीच असा भेदभाव निर्माण झाला होता. हा भेद व्यक्तीच्या योग्यतेवर अवलंबून नव्हता. जाती-जातींमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठता मानली जाऊ लागल्यामुळे समाजात तेढ, संघर्ष वाढू लागला. या परिस्थितीतून समाजाला योग्य वळण लावण्यासाठी वर्धमान महावीर, गौतम बुद यांनी नवे विचार मांडले.
याच काळात चार्वाक, कपिल यांनी समाजातील अंधश्रद्धा कमी करण्याचा प्रयत्न केला.
जैन धर्माची स्थापना ऋषभदेव यांनी केली. त्यांच्यानंतर आणखी तेवीस तीर्थंकर झाले. धर्माची तत्त्वे प्रकट करणाऱ्या व्यक्तीस ‘तीर्थंकर’ असे म्हणतात. वर्धमान महावीर हे जैन धर्माचे ‘चोवीसावे तीर्थंकर’ होते.
ऋषभदेव यांचा जन्म अयोध्या येथे झाला तर निर्वाण ‘कैलास’ येथे झाले.
*Vardhaman Mahaveer वर्धमान महावीर :
• वर्धमान महावीर यांचा जन्म इ. स. पूर्व 599 साली बिहार राज्यातील कुंडग्राम येथे झाला.
• वर्धमान महावीरांच्या आईचे नाव त्रिशला व वडिलांचे नाव सिद्धार्थ असे होते.
• सर्व सुखाचा त्याग करून ज्ञानप्राप्तीसाठी ते भारतात फिरले. त्यांनी बारा वर्षे खडतर तपश्चर्या केली. त्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली.
• वर्धमान महावीरांनी इंद्रियांवर विजय मिळवला होता. म्हणून लोक त्यांना ‘जिन’ म्हणून लागले.
• आपला उपदेश सर्वसामान्य लोकांना कळावा म्हणून त्यांनी ‘अर्धमागधी’ या लोकभाषेचा वापर केला.
• महावीरांचा मृत्यू इ. स. पूर्व 527 रोजी झाला.
*जैन धर्मातील पंचमहाव्रते :
महावीरांनी अहिंसा हे सर्वश्रेष्ठ तत्त्व मानले. कोणत्याही प्रकारची हिंसा त्यांना मान्य नव्हती. त्यांनी आपल्या अनुयायांना आचरणाचे जे नियम सांगितले त्यांना चमहाव्रते’ म्हणतात.
१. अहिंसा : कोणत्याही जीवाची हिंसा करू नये.
२. सत्य: नेहमी खरे बोलावे, खरेपणाने वागावे.
३. अस्तेय: चोरी करू नये. चोरीचा माल घेऊ नये.
४. अपरिग्रह कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेचा साठा करू नये.
५. ब्रह्मचर्य : आचरण शुद्ध ठेवावे.
*जैन धर्मातील त्रिरत्ने:
वर्धमान महावीरांनी सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र अशी तीन तत्त्वे सांगितली आहेत. त्यांना ‘त्रिरत्ने’ म्हणतात.
*1सम्यक दर्शन :
महावीरांच्या तत्त्वज्ञानावर श्रद्धा ठेवणे.
*2 सम्यक ज्ञान :
महावीरांच्या शिकवणीचे व जैन तत्त्वज्ञानाचे ज्ञान करून घेणे.
*3 सम्यक चारित्र्य :
महावीरांच्या शिकवणीचे व जैन तत्त्वज्ञानाचे आचरण करणे.
*महावीरांनी दिलेली शिकवण :
• मोठेपणा जातीवर अवलंबून नसतो, तर उत्तम चारित्र्यावर अवलंबून असतो.
• पुरुषांप्रमाणे स्त्रियांना तपश्चर्या करण्याचा, ज्ञान मिळवण्याचा, संन्यास घेण्याचा अधिकार आहे.
• सर्व प्राणिमात्रांवर प्रेम करा. अंतःकरणात दया व करुणा असू द्या.
*जैन धर्मातील प्रमुख पंथ :
(१) दिगंबर पंथ,
(२) श्वेतांबर पंथ.
*जैन धर्मियांची पवित्र स्थाने :
(१) श्रवणबेळगोळ, कर्नाटक
(२) दिलवाडा, आबू पर्वत
(३) पावापुरी, बिहार
(४) शत्रुंजयतीर्थ, गुजरात
(५) गिरनार तीर्थ, गुजरात
(६) शंखेश्वर, गुजरात
*जैन लेणी :
वेरूळ (महाराष्ट्र)
*राजाश्रय :
बिंबिसार, चंद्रगुप्त मौर्य, अजातशत्रू, खारवेल, अमोघवर्ष.