*मध्ययुगीन भारत
*राजकीय व लष्करी कारणे :
• मुघल साम्राज्य बादशाहाच्या वैयक्तिक कर्तत्वावर अवलंबून होते.
• औरंगजेबानंतर खंबीर व प्रभावी नेतृत्व मिळू शकले नाही.
• खंबीर नेतृत्वाच्या अभावामुळे प्रांतिक सुभेदारांनी आपापल्या प्रांतात स्वतंत्र सत्ता स्थापन केली.
• मन्सबदारी पद्धत मुघल साम्राज्याचा कणा होता. अठराव्या शतकात मन्सबदारी पद्धत सदोष होऊ लागली.
• मन्सबदार स्वार्थी, भ्रष्टाचारी, निष्ठाहीन होऊ लागले.
• या सर्व बाबींमुळे मुघल साम्राज्य परकीय आक्रमण परतवू शकले नाही.
*आर्थिक कारणे :
• मुघल साम्राज्याच्या विस्तारामुळे खर्च वाढू लागला.
• मन्सबदारांची संख्या वाढली.
• लष्कर व प्रशासनावरील खर्च वाढला.
• शेती उत्पन्न ढासळले. शेतसारा कमी गोळा झाला.
• व्यापार, उद्योगधंदे वाढले नाहीत, त्यामुळे जकात, अबकारी कर कमी झाला.
• युद्धे, सरदारांचे विलासी राहणीमान यामुळे मुघल साम्राज्याची अर्थव्यवस्था ढासळली.
*औरंगजेब बादशहाची धोरणे :
• मुघल साम्राज्यात अनेक जातिधर्माचे लोक होते.
• औरंगजेबाच्या असहिष्णू व सनातनी धोरणामुळे समाजात एकोपा कमी झाला होता.
• जिझिया व यात्राकर यांसारखे जाचक कर औरंगजेबाने मुस्लिमेतरांच्यावर लादले.
• औरंगजेब बादशाह कर्तृत्ववान होता; पण त्याचा कोणत्याही अधिकाऱ्यावर विश्वास नव्हता.
• औरंगजेबाने मराठ्यांशी सतत पंचवीस वर्षे संघर्ष केला. त्यात मुघल साम्राज्याची जीवितहानी व वित्तहानी झाली.
• महाराष्ट्रातील दीर्घकाळ वास्तव्यामुळे बादशाहीची उत्तरेकडील प्रशासनावरील पकड ढिली झाली.