•19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
•मुघलांनी 1636 साली निजामशाहीचा पाडाव आदीशाहीच्या मदतीने केला.
• निजामशाहीच्या पाडावानंतर शहाजीराजे आदिलशाहीचे सरदार झाले.
• शहाजीराजांना चाकण, पुणे, सुपे, इंदापूर या भागांची जहागिरी आदिलशाहाने दिली.
• इ. स. 1641 च्या सुमारास शहाजीराजांनी जहागिरीचा कारभार जिजाबाई व शिवाजीराजे यांच्यावर सोपवला.
• सोबत दादोजी कोंडदेव हा निष्ठावंत सेवक दिला होता.
• जहागिरीच्या माध्यमातून जिजाबाईंनी शिवाजीराजांच्या मनात स्वराज्याची प्रेरणा निर्माण केली.
• शिवरायांना येसाजी कंक, दादाजी नरसप्रभू, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, जिवा महाला, बाजीप्रभू देशपांडे, बाजी पासलकर यांसारखे सहकारी मिळाले.
• स्वराज्य स्थापनेची सुरुवात शिवाजी महाराजांनी मावळ भागात केली.
• इ. स. 1645 मध्ये शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.
• स्वराज्य स्थापनेच्या हालचाली :
• शिवाजी महाराजांच्या जहागिरीतील किल्ले आदिलशाहाच्या ताब्यात होते. ते त्यांनी घेण्यास सुरुवात केली.
• स्वराज्य निर्मितीच्या कार्यास आदिलशाही वतनदारांनी विरोध केला.
• जावळीचे मोरे, सुप्याचे मोहिते, मुधोळचे घोरपडे, वाढीचे सावंत यांना स्वराज्यापेक्षा वतने प्रिय होती.
*जावळीचा ताबा :
• जावळीच्या चंद्रराव मोरेचा शिवाजी महाराजांना विरोध होता.
•इ. स. 1656 मध्ये शिवरायांनी जावळी जिंकली. मोऱ्यांचा पाडाव केला.
• जावळीच्या विजयामुळे स्वराज्याचा विस्तार झाला.
• जावळीच्या प्रदेशात शिवाजी महाराजांनी प्रतापगड हा किल्ला बांधला.
• जावळीच्या विजयाने शिवाजी महाराजांचे सामर्थ्य वाढले. त्यानंतर त्यांनी सावंत, मोहिते यांचा बंदोबस्त केला.
*अफजलखानाचे पारिपत्य :
• जावळीच्या विजयानंतर शिवाजी महाराजांनी कोकण किनारपट्टी ताब्यात घेतली.
• आदिलशाही दरबारात खळबळ उडाली.
• आदिलशाहाने अफजलखानास इ. स. 1659 मध्ये महाराष्ट्रात पाठवले
• अफजलखान-शिवाजी महाराज भेटीस खानाने दगाफटका केल्यामुले शिवाजी महाराजांनी त्याला ठार मारले.
• त्या वेळी शिवाजी महाराजांचे वकील पंताजी गोपीनाथ व खानाचे वकील कृष्णाजी भास्कर होते.
*सिद्दी जौहरचा पन्हाळगडाला वेढा :
•अफजलखानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांनी आदिलशाहाचा पन्हाळगड हा किल्ला जिंकून घेतला.
•इ. स. 1660 साली आदिलशाहाने सिद्दी जौहरला पन्हाळगडावर चाल करण्यास पाठवले.
• शिवाजी महाराज मुत्सद्देगिरीने पन्हाळगडावरून निसटले व विशाळगडास पोहोचले.
• पन्हाळगडावर शिवा काशीदने बलिदान दिले.
• वाटेत घोडखिंडीत (पावनखिंड)संभाजी जाधव,विसोजी काटे, बाजीप्रभू देशपांडे आदि शिलेदारांडी बलिदान दिले.