Chatrapati Shivaji Maharaj: शिवरायांची स्वराज्य स्थापना 

•19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवाजी महाराजांचा जन्म झाला.

•मुघलांनी 1636 साली निजामशाहीचा पाडाव आदीशाहीच्या मदतीने केला.

• निजामशाहीच्या पाडावानंतर शहाजीराजे आदिलशाहीचे सरदार झाले.

• शहाजीराजांना चाकण, पुणे, सुपे, इंदापूर या भागांची जहागिरी आदिलशाहाने दिली.

• इ. स. 1641 च्या सुमारास शहाजीराजांनी जहागिरीचा कारभार जिजाबाई व शिवाजीराजे यांच्यावर सोपवला.

• सोबत दादोजी कोंडदेव हा निष्ठावंत सेवक दिला होता.

• जहागिरीच्या माध्यमातून जिजाबाईंनी शिवाजीराजांच्या मनात स्वराज्याची प्रेरणा निर्माण केली.

• शिवरायांना येसाजी कंक, दादाजी नरसप्रभू, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, जिवा महाला, बाजीप्रभू देशपांडे, बाजी पासलकर यांसारखे सहकारी मिळाले.

• स्वराज्य स्थापनेची सुरुवात शिवाजी महाराजांनी मावळ भागात केली.

• इ. स. 1645 मध्ये शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.

• स्वराज्य स्थापनेच्या हालचाली :

• शिवाजी महाराजांच्या जहागिरीतील किल्ले आदिलशाहाच्या ताब्यात होते. ते त्यांनी घेण्यास सुरुवात केली.

• स्वराज्य निर्मितीच्या कार्यास आदिलशाही वतनदारांनी विरोध केला.

• जावळीचे मोरे, सुप्याचे मोहिते, मुधोळचे घोरपडे, वाढीचे सावंत यांना स्वराज्यापेक्षा वतने प्रिय होती.

*जावळीचा ताबा :

• जावळीच्या चंद्रराव मोरेचा शिवाजी महाराजांना विरोध होता.

•इ. स. 1656 मध्ये शिवरायांनी जावळी जिंकली. मोऱ्यांचा पाडाव केला.

• जावळीच्या विजयामुळे स्वराज्याचा विस्तार झाला.

• जावळीच्या प्रदेशात शिवाजी महाराजांनी प्रतापगड हा किल्ला बांधला.

• जावळीच्या विजयाने शिवाजी महाराजांचे सामर्थ्य वाढले. त्यानंतर त्यांनी सावंत, मोहिते यांचा बंदोबस्त केला.

*अफजलखानाचे पारिपत्य :

• जावळीच्या विजयानंतर शिवाजी महाराजांनी कोकण किनारपट्टी ताब्यात घेतली.

• आदिलशाही दरबारात खळबळ उडाली.

• आदिलशाहाने अफजलखानास इ. स. 1659 मध्ये महाराष्ट्रात पाठवले

• अफजलखान-शिवाजी महाराज भेटीस खानाने दगाफटका केल्यामुले शिवाजी महाराजांनी त्याला ठार मारले.

• त्या वेळी शिवाजी महाराजांचे वकील पंताजी गोपीनाथ व खानाचे वकील कृष्णाजी भास्कर होते.

*सिद्दी जौहरचा पन्हाळगडाला वेढा :

•अफजलखानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांनी आदिलशाहाचा पन्हाळगड हा किल्ला जिंकून घेतला.

•इ. स. 1660 साली आदिलशाहाने सिद्दी जौहरला पन्हाळगडावर चाल करण्यास पाठवले.

• शिवाजी महाराज मुत्सद्देगिरीने पन्हाळगडावरून निसटले व विशाळगडास पोहोचले.

• पन्हाळगडावर शिवा काशीदने बलिदान दिले.

• वाटेत घोडखिंडीत (पावनखिंड)संभाजी जाधव,विसोजी काटे, बाजीप्रभू देशपांडे आदि शिलेदारांडी बलिदान दिले.

Leave a comment