भारताचे ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यामुळे पाकिस्तानचा जळफळाट झाला. पाकिस्तानने पोज भागातील नागरी वस्त्यांवर गोळीबार केला. त्याचबरोबर भारतातील पंधरा शहरांमधील लष्करी ठाण्यांवर हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व हवाई हल्ले भारताने परतून लावल्यानंतर जशास तसे उत्तर देण्यासाठी लाहोरसह अनेक शहरांवरील पाकिस्तानची एअर डिपेंड सिस्टीम नष्ट केली. काय घडले सविस्तर जाणून घेऊया.
ऑपरेशन सिंदूर नंतर काय घडले? What happened after Operation Sindoor?
भारत सरकारने पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 7 मे 2019 रोजी पहाटे एक वाजून पाच मिनिटे ते एक वाजून तीस मिनिटे या 25 मिनिटांच्या काळात पाकिस्तानमधील आतंकवाद्यांचे नऊ स्थळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानला हा खूप मोठा धक्का होता. पाकिस्तान त्यानंतर झोपला नाही त्याने अनेक डावपेच आखण्यास सुरुवात केली. तिकडे पूंछ भागात नागरी वस्त्यांवर गोळीबार केल्यामुळे जवळजवळ 16 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. पण त्याहीपेक्षा मोठा डाव पाकिस्तानचा होता. काय होता तो डाव? जाणून घेऊया पुढे-
भारतातील पंधरा शहरांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा डाव उधळला गेला: India foiled Pakistan’s plan to attack military posts in 15 cities in India.
ऑपरेशन सिंदूर यशस्वी कार्यवाहीनंतर भारत सावध होता. पाकिस्तान काहीतरी आततायीपणा करेल याची भारताला खात्री होती. म्हणूनच भारतीय लष्कराने डोळ्यात तेल घालून हवाई हल्ले होऊ नयेत याची काळजी घेतली. पाकिस्तानने भारताच्या 15 शहरांवर लष्करी ठाण्यांवर हल्ले करण्याचा बेत आखला होता. आणि हवाई मार्गे हल्ले सुद्धा केले पण—-
कोणत्या 15 शहरांवर पाकिस्तानने हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला? Which 15 cities did Pakistan attempt to launch airstrikes on?
गुजरात मधील भोज, राजस्थान मधील फलोदी ,याशिवाय अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, उरी, पठाणकोट, आदमपूर, पूंछ, बठिंडा, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, चंदीगड, इत्यादी 15 शहरांवरील लष्करी ठाण्यांवर पाकिस्तानने 7 मे च्या पहाटे हल्ले करण्याचा प्रयत्न केला. पण हे सर्व हल्ले भारताने परतवून लावले. पाकिस्तानची सर्व मिसाईल नष्ट करण्यास भारत यशस्वी झाला.
जशास तसे उत्तर देऊ– भारताने केला होता गर्भित इशारा: We will respond accordingly – India had given an implicit warning to Pakistan
ऑपरेशन सिंदूर च्या यशस्वीतेनंतर भारताने पाकिस्तानला सबुरीचा सल्ला दिला होता. जर तुम्ही भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हालाही जशास तसे उत्तर दिले जाईल असे भारत सरकारने ठणकावून सांगितले होते. भारत सरकारने लष्कराला पूर्ण अधिकार दिले होते. सर्व विरोधी पक्षांनीही जशास तसे उत्तर देण्यास सरकारला पाठिंबा दिला होता.
लाहोरसह अनेक शहरांमधील एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट: Pakistan’s air defense systems in many cities including Lahore destroyed
पाकिस्तानी केलेल्या अपयशी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने जशास तसे उत्तर देण्यासाठी पाकिस्तानच्या लाहोर ,रावळपिंडी ,कराची इत्यादी अनेक शहरांमध्ये असलेली एअर डिफेन्स सिस्टीम भारतीय हवाईदलाच्या कारवाईने आणि ड्रोनच्या सहाय्याने केलेल्या माऱ्याने नष्ट झाली. या घटनेमुळे पाकिस्तानचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. आता पाकिस्तानने अन्य मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला आहे. तो कोणता मार्ग? जाणून घेऊया.
पाकिस्तानचे मुस्लिम कार्ड: Muslim card of Pakistan
भारत विरोधी लढा उभारण्यासाठी पाकिस्तानने आता मुस्लिम कार्ड खेळलेले आहे. पाकिस्तानला यापूर्वी चीनने पाठिंबा दिला आहे. आता पाकिस्तानने अनेक मुस्लिम राष्ट्रांना या युद्धात ओढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. इराण या राष्ट्राने पाकिस्तानला पाठिंबा देऊन मिसाईल देण्याचे वचन दिले आहे. मात्र संयुक्त अरब अमिरातने पाकिस्तानला कोणत्याही प्रकारची मदत करणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सर्वच मुस्लिम राष्ट्रीय पाकिस्तानला मदत करतील हे साफ चुकीचे आहे. भारताची सध्याची स्थिती मजबूत असून अनेक मुस्लीम राष्ट्रांनाही भारताची गरज आहे. त्यामुळे पाकिस्तानने खेळलेले हे मुस्लिम कार्ड यशस्वी होणार नाही.
भारत आणि पाकिस्तान युद्ध थांबणे दोघांच्याही हिताचे: It is in the interest of both parties to stop the war.
सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात युद्ध होते की काय ?असे वातावरण सर्वत्र झाले आहे. भारत सरकारवर संपूर्ण नागरिकांच्या दबाव असल्याने भारत सरकारलाही कठोर पावले उचलावी लागत आहे. हे युद्ध मोठ्या प्रमाणात झाले तर रशिया-युक्रेन सारखी स्थिती होईल. अर्थात युक्रेनचे खूप मोठे नुकसान झाले असले तरी रशियाचे काही प्रमाणात का असेना नुकसान झाले आहे. तेच भारत आणि पाकिस्तान यांच्या बाबतीत होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान बेचिराख होईल, पण भारताचे ही नुकसान होईल. म्हणून युद्ध थांबणे हे दोघांच्याही हिताचे असले तरी पाकिस्तानी शरणागती पत्करणे हे त्यांच्या हिताचे आहे. तेव्हाच हे युद्ध थांबेल अशी परिस्थिती पाकिस्ताननेच ओढून घेतली आहे.