*सुलतानशाही
*सुलतानशाही केंद्रीय प्रशासन:
• ‘वजीर’ हा प्रशासनातील सर्वांत मोठा अधिकारी होता.
• ‘सुलतान’ हा प्रशासनाचा प्रमुख होता.
• लष्करी नेतृत्वाबरोबरच राज्याचा वसूल व खर्चाचा हिशेब ठेवण्याचे काम त्याला करावे लागे.
• वजीराच्या मदतीला अनेक दुय्यम अधिकारी असत. ते सैन्यभरती, लष्कराला शस्त्रसज्जन ठेवणे इत्यादी कामे करत.
• पत्रव्यवहार सांभाळण्यासाठी ‘दिवाण-इ-इन्शा’ हा अधिकारी असे.
• धार्मिक व्यवहार व दानधर्मादी कामे करण्यासाठी ‘दिवाण-इ-रिसालत’ हा अधिकारी असे.
*सुलतानशाही प्रांतिक प्रशासन :
• प्रशासनाच्या सोईसाठी विविध प्रशासकीय विभाग पाडण्यात आले. त्यांना ‘इक्ता’ असे म्हणत.
• इक्ताचे विभाजन अनेक ‘शिक’ मध्ये केलेले होते.
• ‘शिक’चे विभाजन ‘परगणा ‘मध्ये केले होते.
• अनेक गावांचा मिळून ‘परगणा’ बनत असे.
• इक्तावर प्रमुख अधिकारी – मुफ्ती.
• शिकचा प्रमुख अधिकारी – शिकदार.
• परगण्याचा प्रमुख अधिकारी- अमीन.
• शहराच्या प्रशासनासाठी ‘कोतवाल’ हा अधिकारी असे.
*सुलतानशाहीतील आर्थिक जीवन
• या काळात अन्नधान्याच्या उत्पादनाबरोबरच नगदी पिके घेण्यात सुरुवात
• मसाल्याचे पदार्थ व चंद्राला परदेशात मागणी होऊ लागली.
• भारतातून मलमल, कापड, अन्नधान्य, आशिया, युरोप, आफ्रिकेत निर्यात होत असे.
• व्यापारवृद्धीमुळे दिल्ली, लाहोर, लखनौ, खंबायत, सोनारगाव या शहराचा उदय झाला.
• उद्योगधंद्यासाठी प्रसिद्ध गावे –
कांजीवरम रेशमी कापड
मदुराई – सिल्क फॅब्रिक
बिदर बिदरी काम
गोवळकोंडा बिद्री काम
राजस्थानातील शहरे मिनाकाम.
*सुलतानशाहीतील समाजजीवन :
• सुलतानशाहीत बहुतेक सुलतान मुसलमान होते आणि प्रजा हिंदू होती.
• भाषा, धर्म, संस्कृती भिन्न असलेल्या प्रजेशी जुळवून घेण्याच्या प्रयत्न सुलतानशाहीत झाला.
• सुलतानांनी प्रशासन चालवण्यासाठी स्थानिक लोकांना महत्त्वाच्या जागा दिल्या.
• पाटील, कुलकर्णी, देशमुख, देशपांडे इत्यादी हुट्यांचा त्यांनी प्रशासनात समावेश केला.
• सुलतानशाहीतील नाण्यावर ‘श्री’ हे अक्षर कोरलेले आढळते.
• या काळात जातिव्यवस्था कडक झाली. स्त्रियांची स्थिती अधिकच खालावली.