कच्च्या तेलातच्या किंमतीतील घसरणणमुळे भारतीय शेअर बाजाराला मोठा दिलासा मिळाला आहे. असे जरी असले तरी मान्सूनची चालढकल ,अस्थिरता याचा परिणाम काही अंशी पुन्हा शेअर बाजारावर होऊन घसरत चाललेला भारतीय शेअर बाजार मान्सूनच्या अनिश्चिततेमुळे पुन्हा उचल खाईल अशी शक्यता पण कमी आहे.
कच्च्या तेलाचे दर 40 टक्क्यांनी घसरले
अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध शांतता करार झाल्यामुळे कच्च्या तेलाचे दर तब्बल 40 टक्क्यांनी घसरले आहेत .120 डॉलर प्रति बॅरलवर अशा उच्चांकी पातळीवरून 40 टक्क्याहून अधिक तर प्रतिबॅरलचा घसरला आहे. म्हणजे सध्या प्रतिब्यारल साठ डॉलर मोजावे लागतात. त्यामुळे भारताच्या आयात खर्चावरील दबाव काहीच कमी झाला आहे. मात्र बाजारातील हा सकारात्मक परिणाम येत्या काळात मर्यादित राहण्याची शक्यता आहे. तो मान्सूनच्या अनियमित्येमुळे. पावसात खंड पडल्यास त्याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होतो आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले तर महसूल वाढीवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मोडकळीस येण्यास मान्सून कारणीभूत ठरवू शकतो.