Buddha Life Story-Part 27 :गौतम बुद्धाचे राजा बिंबिसार यास उत्तर

राजा बिंबिसार‌ने गौतम बुद्धाला वेगवेगळया प्रकारे समजावून सांगितले. पण त्याचा काहीही परिणाम गौतम बुद्धावर झाला नाही. उलट बुद्धानेच बिंबिसारला जे काही उत्तर दिले, त्यातून बुद्धाच्या पुढील आयुष्याची दिशा स्पष्ट झाली होती. गौत‌माने शांतपणे आणि खंबीरपणे बिंबिसारला उत्तर दिले. ते पुढीलप्रमाणे- “.. महाराज, सिंह हे तुमच्या राजघराण्याचे चिन्ह आहे. त्या चिन्हाला साजेसेच आपले विचार, कीर्ती आणि … Read more

Buddha Life Story-Part 26: राजा बिंबिसारचा गौतम बुद्धाला उपदेश

सिद्धार्थ गौतमाने कपिलवस्तू सोडल्यावर मगध देशात प्रवेश केला. राजगृह’ ही मगधची राजधानी. या राजधानीत आल्यावर एक दिवस राजगृह नगराच्या बाहेरच मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी भिक्षा मागण्यासाठी सिद्घार्थ राजगृहात आला. भिक्षा मागत मागत सिद्धार्थ राजवाड्याजवळ आला होता. सि‌द्धार्थला पाहण्यासाठी प्रचंड जनसमुदाय जमला होता. राजा बिंबिसारलाही आश्चर्य वाटले. म्हणून त्याने चौकशी केली. तर शाक्य राजपुत्र सिद्धार्थ … Read more

Buddha Life Story-Part 25 :सिद्धार्थ गौतमाचे मगध देशात आगमन

कपिलवस्तू सोडल्यानंतर सिद्धार्थ गौतमाने मगध राज्याची राजधानी राजगृ‌हाकडे जाण्याचा निर्णय घेतला. कपिलवस्तू ते राजगृह हे अंतर सुमारे 600 किमी होते. हे सर्व अंतर सिद्धार्थ गौतम पायीच जाणार होता. त्यावेळी मगधचा राजा बिंबिसार होता. बिंबिसार हा विचारवंत राजा होता. त्याच्याकडे मोठमोठे तत्वज्ञ आणि विचारवंत होते. त्यावेळी विचारवंतांचे निवासस्थान राजगृह झाले होते. सिद्धार्थ गौतमाने गंगेचे वाहते पात्र … Read more

Buddha Life Story-Part 24 :सिद्धार्थ गौतमाचे शोकाकुल कुटुंब

सिद्धार्थ गौतमाचा सेवक तथा सोबती छन्न पर‌तण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शुद्धोदन आणि गौतमीची निराशा झाली होती. त्यांनी शेवटचा प्रयत्न छन्नवर सोपवला होता ,पण छन्नही रिकाम्या हातांनी मागे परतला. कंटक घोडाही अस्वस्थ अवस्थेत अश्वशाळेत परतला होता.तो जोरजोरात खिंकाळत होता. राजगृहातील अनेक स्त्रिया दुःखावेगाने मूर्च्छित झाल्या होता. गौतमीची अवस्था तर खूपच वाईट झाली होती. अनेक स्त्रिया आशाळभूत … Read more

Buddha Life Story-Part 23 :अखेर छन्न माघारी परतला.

राजपुत्र सिद्धार्थची आणि सेवक छन्न यांची खूप चर्चा झाली, पण सिद्धार्थने काही आपला निर्णय बद‌लला नाही. त्यामुळे खिन्न झालेला छन्न दुःखाने रडत रडत कंठक घोड्यासह माघारी परतत होता. दोघांनाही कपिलवस्तूला परतायला काही दिवस लागले. इतक्या हळूहळू ते माघारी परतत होते. कंठकही अस्वस्थ झाला होता. तोही पाठीमागे वळून वळून पाहत पुढे जात होता. कोणीतरी जरदस्तीने पुढे … Read more

Buddha Life Story-Part 21 :सिद्धार्थ गौतमाचा गृहत्याग

शाक्य संघात झालेल्या पराभवामुळे आणि कोरियांविरुद्ध शाक्यांनी पुकारलेल्या युद्धात सह‌भागी होण्यास नकार दिल्यामुळे शाक्य संघाने दिलेली शिक्षा म्हणून सिद्धार्थने परिव्रजेचा (संन्यास) निर्णय घेतला होता. पत्नी यशोद‌रेने या परिव्रज्येसाठी दिलेल्या संमतीमुळे सिद्धार्थचे मन थोडे हलके झाले होते.आपल्या पुत्राचे, पत्नीचे अखेरचे दर्शन घेऊन त्यांच्याकडे वात्सल्यवृत्तीने पाहून सिद्धार्थ यशोद‌रेच्या महालातून बाहेर पडला. कपिलवस्तु नगरातच भार‌द्वाज ऋषीचा आश्रम होता. … Read more

BuddhaLifeStory-Part : 17 : बुद्धाची देशत्यागाची तयारी

बुद्धाचा जीवन परिचय करून देत असताना मागील भाग 16 मध्ये सेनापती आणि सि‌द्धार्थ यांच्यात जो युद्धाच्या संबंधी वाद झाला त्यातून सिद्धार्थचा संघात पराभव झाला. दुसऱ्या दिवशी सेनापतीने कोलियाशी युद्ध करण्यासाठी व सैन्य उभारावासाठी शाक्य संघाची सभा बोलावली. त्या सभेत सेनापतीने आणखी एक ठराव मांडला तो असा- “कोलियांशी युद्ध करण्यासाठी 20 ते 25 वर्षे वयाच्या युवकांची … Read more

Buddha Life Story-Part 15 :सि‌द्धार्थचा शाक्य संघात प्रवेश

इ.स. पूर्व सहाव्या शतकात आणि त्यापूर्वी आणि त्यानंतरही सुद्धा शाक्यांचा एक संघ होता. संघ ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. या परंपरेनुसार वयाची वीस वर्षे पूर्ण झाल्यावर शाक्य युवकाला संघाची दीक्षा दिली जाते.ती सर्वांना मिळत होती, असे नाही. या संघाचे सभासद होण्यासाठी सिद्धार्थ गौतमालाही वीस वर्षे पूर्ण झाल्यामुळे शाक्य संघात प्रवेश करणे अनिवार्य वाटत होते. … Read more

Buddha Life Story-Part 14

महामंत्री हरला – बुद्ध जिंकला. राजा शुद्धोदनाच्या सांगण्यावरूनच महामंत्री उदयीनने सिद्धार्थ गौतमाला विषय सुखात अड‌कण्याचा खूप प्रयत्न केला. त्याने त्यासाठी पुराणातील ऋषीमुनींचे आणि राजांचे दाखले दिले होते. जेणे करून सिद्धार्थचे मन परिवर्तन होईल आणि सिद्धार्थ विषय-सुखात रमून जाईल; पण त्या खटाटोपाचा काहीच उपयोग झाला नाही.सिद्धार्थने महामंत्र्याला कशा प्रकारे उत्तर दिल ते पाहू—— “हे महामंत्री, तुला … Read more

Buddha: Life Story Part 13 :सि‌द्धार्थाला विषयसुखाकडे वळवण्यासाठी महामंत्र्याचा आटापिटा

सिद्धार्थ गौतमाला कामवासनेत म्हणजेच विषय सुखात बुडवण्यासाठी कपिलवस्तू नगरातील आणि नगराच्या बाहेरीलही सौंद‌र्यवतींना तीन महालात आणि त्या महालांच्या आवारातील उद्यानात आणून ठेवले होते. पण या सर्व सौंदर्यवतींना सिद्धार्थला जिंकण्यास अपयश आले होते. त्यांच्या अंगविक्षेपाने सिद्धार्थाची स्थितप्रज्ञता भंग पावली नाही. शेवटी राजपुरोहित अर्थात महामंत्र्याने स्वतः सिद्धार्थला या मोहजाळ्यात अडकवण्यासाठी आणि सिद्घार्थाशी संवाद साधण्याचा निश्चय केला. राजा … Read more