मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष म्हणून औरंगजेबच्या कबरीकडे पाहिले जाते. तब्बल 26 वर्ष महाराष्ट्रातच मुक्काम ठोकून राहिलेल्या बादशहाला दिल्लीत जाण्यापूर्वीच महाराष्ट्राच्या मातीत गाढले गेले. खरंच औरंगजेबची कबर नष्ट करणे योग्य आहे का? औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा आत्ताच का उपस्थित झाला? याबाबत जाणून घेऊया सविस्तर इतिहास.
औरंगजेबची कारकीर्द
औरंगजेब हा क्रूरकर्मा होता हे संपूर्ण भारताला आणि मराठ्यांनाही माहीत होते. तो ज्या पद्धतीने दिल्लीच्या गादीवर विराजमान झाला ते पाहता त्याची धोरणे काय असतील हे आपल्याला समजून येते. मोगल बादशाह शाहजहान हा औरंगजेबचा पिता. त्यालाच तुरुंगात दाबून औरंगजेब आपण स्वतः गादीवर बसला. 3 नोव्हेंबर 1618 सोळाशे साली औरंगजेबचा जन्म झाला.1689 मध्ये त्याने आपल्या पित्याला म्हणजेच शाहजहानला पदच्युत करून आपण स्वतः गादीवर बसला. त्याने दिल्लीच्या गादीवर 22 वर्षे राज्य केल्यानंतर त्याच्या राज्यातही बंडाळी माजली. त्याचाच पुत्र अकबर याने बंद केले. राजपूताना साथीला घेतले, पण त्याचे बंड टिकले नाही. धूर्त औरंगजेबाने आपल्या कपटकारस्थानाने आणि मुत्सद्दीपनाने अकबराचे बंड मोडीत काढले. अकबर दक्षिणेत स्वराज्याच्या आश्रयाला आला. त्यावेळी स्वराज्याचे छत्रपती संभाजी महाराज होते. त्यांनी आपली भेट सहजासहजी अकबराला दिली नसली तरी काही काळानंतर त्याच्याशी जुळवून घेऊन त्याला आश्रय दिला. औरंगजेबला या गोष्टीची खूप चीड होती. त्याचबरोबर आपल्या एकमुखी साम्राज्याला अखंड भारत वर्षात कोणी सुरुंग लावला तर ते मराठीच असतील. अशी ही रुखरुख औरंगजेबला होती. म्हणूनच औरंगजेबने आपल्या लव्याजम्यासह सात लाख सैन्य घेऊन दक्षिणेत येण्याचा निर्णय घेतला.
औरंगजेबचे महाराष्ट्रात आगमन
1682 साली औरंगजेब महाराष्ट्रात आपल्या सात लाख सैन्यांसह दाखल झाला. त्यावेळी स्वराज्यात छत्रपती संभाजी महाराज हे स्वतः छत्रपती होते. त्याने अंतर्गत कलहाला तोंड देतच औरंगजेबला धडा शिकवण्याचा निर्धार केला. औरंगजेबने आपल्या सैन्याचे विभाजन करून वेगवेगळ्या मोहिमेवर वेगवेगळे सरदार पाठवले आणि स्वराज्याचा छत्रपती संभाजीला घेरण्याचा प्रयत्न केला. छत्रपती संभाजी राजांनी औरंगजेबची निकराचा लढा दिला. 1682 ते 1685 सालापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबच्या सैन्यांना सळो की पळो करून सोडले. त्यामुळे औरंगजेबने आपले लक्ष दक्षिणेकडे वळवले. त्याने दोन वर्षात विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही जिंकून घेतली आणि पुन्हा तो स्वराज्याच्या दिशेने वळला. पण छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या मोहिमेवर पाणी फिरवले. त्याला कोणत्याही बाबतीत कोणत्याही लढाई मराठ्यांविरुद्ध मोठा लढा जिंकता आला नाही. त्यामुळे त्याने आपले गुप्तहेर सगळीकडे पेरले आणि संभाजी महाराजांना गाफील देऊन पकडण्याचा डाव टाकला.
स्वराज्यातील अंतर्गत फितुरीमुळे संभाजी महाराज सैन्यांसह संगमेश्वरला असल्याची बातमी औरंगजेबला लागली आणि मुकर्रबखानाला संभाजीला कैद करण्यासाठी पाठवले. दुर्दैवाने स्वराज्याचे छत्रपती मुकर्रबखानाच्या कैदेत सापडले. स्वराज्याचे छत्रपती संभाजी महाराज कैदेत सापडल्यानंतर मराठ्यांचा विरोध मोडण्यासाठी स्वराज्याच्या छत्रपतींना औरंगजेब आणि त्याला साथ देणारे स्वराज्यद्रोही यांनी मराठ्यांच्या छत्रपतींना हालहाल करून मारले. छत्रपती संभाजी महाराजांनी नऊ वर्ष निकराचा लढा देऊन औरंगजेबला स्वराज्य जिंकू दिले नव्हते.
राजाराम महाराज आणि औरंगजेब यांच्यात संघर्ष
छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर काही काळ स्वराज विस्कळीत झाले असले तरी महाराणी येसूबाई यांनी स्वतःला सावरले आणि राजाराम महाराजांना गादीवर बसवले. जुल्फीकारखान्याने रायगडला वेढा दिल्यावर राणी येसूबाई यांनी स्वराज्याच्या छत्रपतीला आणि महाराणी ताराबाई हिला दक्षिणेत पाठवून दिले आणि स्वतः रायगडावर थांबल्या. त्याने नऊ महिने रायगड लढवला पण अखेर सूर्याजी पिसाळ या फितूर आणि रायगडचा गुप्तमार्ग दाखवला आणि रायगड मुघलांच्या ताब्यात गेला. राणी येसूबाई, पुत्र शाहू आणि राजाराम महाराजाची दुसरी पत्नी यांना मुघलांनी कैद केले.राजाराम महाराज यांनी कर्नाटक मार्गे जिंजीच्या किल्ल्यात प्रवेश केला आणि तेथूनच राज्यकारभाराची सूत्रे हलवायला सुरुवात केली. त्यांनी जिंजीच्या किल्ल्यातून रामचंद्र पंत यांना कारभाराचे उत्तरदायित्व दिले. महाराणी ताराबाई या सुद्धा पन्हाळगड, विशाळगड अशा गडावरून काही काळ कारभार करून त्याही कर्नाटक मार्गे जिंजीला गेल्या आणि तेथे काही दिवस वास्तव्य केले. राजाराम महाराज यांच्या काळात संताजी आणि धनाजी यांनी औरंगजेबला जेरीस आणले. औरंगजेबच्या तंबूचा कळस कापण्यासही मागेपुढे पाहिले नाही. त्यामुळे औरंगजेबचे स्वराज्य बुडवण्याचे स्वप्न आणखी धूसर झाले होते. संताजी आणि धनाजी यांनी औरंगजेब आणि त्याच्या सैन्यांना जेरीस आणले होते .औरंगजेब चे स्वास्थ्य बिघडत चालले होते. त्याचा स्वभाव चिडचिडा बनला होता. आपल्या पुत्रांना नाकाम म्हणून चिडवत होता.
राजाराम महाराज यांचा मृत्यू
झुल्पीकारखान्याला फितूर करून आणि गणोजी राजे शिर्के यांच्या मदतीने राजाराम महाराज यांनी जिंजीच्या वेढ्यातून उत्तरेस म्हणजे स्वराज्याच्या दिशेने पलायन केले. त्यांनी स्वराज्यात आल्या आल्या स्वराज्याची विस्कटलेली घडी बसवायला सुरुवात केली. औरंगजेबने घेतलेले काही किल्ले ताब्यातही घेतले. पुढे ते तब्येतीच्या तक्रारीमुळे सिंहगडला राहायला गेले. तेथेच त्यांचे इसवी सन 1700 मध्ये महानिर्वाण झाले. राजाराम महाराजांची मृत्यूची बातमी समजतात औरंगजेब आनंदी झाला. आता आपल्याला स्वराज्य घडवण्यास फार वेळ लागणार नाही असे वाटले.
महाराणी ताराबाई आणि औरंगजेब संघर्ष
महाराणी ताराबाई या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होय. त्या पित्याप्रमाणेच धाडसी, कर्तबगार आणि लढवय्या होत्या. त्यांनी औरंगजेबशी निकराची लढाई दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गनिमी काव्याचे सूत्र वापरून औरंगजेबला जेरीस आणले. इतकेच नाही तर औरंगजेबला चलबिचल करण्यासाठी उत्तरेत गुजरातपर्यंत महाराणी ताराबाई यांच्या सैन्याने दौड मारली. त्यांचे घोडे चौथे उधळत होते. आणि औरंगजेब चे मनसुबे तुटत होते. औरंगजेब हताश झाला होता. स्वराज्याचे अनेक किल्ले त्याने ताब्यात घेतले होते, पण संपूर्ण स्वराज्य बुडवण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण होत नव्हते. राजाराम महाराज यांच्या काळात महाराणी ताराबाई यांनी कणखर भूमिका घेऊन स्वराज्याची जिवंत ठेवली होती. राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर आपला पुत्र दुसरा शिवाजी याला गादीवर बसून त्यांनी राज्यकारभाराची सूत्रे स्वतःच्या हातात घेतली. औरंगजेब हळूहळू क्षीण होत होता. पण त्याला उत्तरेसही तोंड द्यायला जागा राहिला नव्हता. पराभूत औरंगजेब अशी प्रतिमा घेऊन त्याला उत्तरे कडे जावे लागणार होते. हीच गोष्ट त्याला वारंवार खटकत होती. त्याचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडत होते.
औरंगजेबचा मृत्यू
सर्वच बाजूंनी थकलेल्या औरंगजेबने अखेर 3 मार्च 1760 रोजी अहमदनगर येथे प्राण सोडले. त्याच्या मृत्युपत्रानुसार औरंगजेब ची कबर खुलताबाद येथे अगदी साध्याच पद्धतीने बांधण्यात आली. औरंगजेब एक बादशहा म्हणून क्रूर असला तरी त्याचे वैयक्तिक जीवन हे साधेपणाचे होते.
औरंगजेबची कबर आणि स्वराज्याचा धगधगता इतिहास
औरंगजेबने 26 वर्षे महाराष्ट्रात येऊन स्वराज्य घडवण्यासाठी त्याने आटोकाट प्रयत्न केले. पण त्याला छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य बुडवता आले नाही. हे औरंगजेबच्या खंड जीवणातील येईल फार मोठे शल्य आहे. हा इतिहास आहे. मराठ्यांनी औरंगजेबला जेरीस आणले होते. सात आठ लाख सैन्यापुढे मराठे झुकले नव्हते. त्यांनी शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या काळात वेगवेगळ्या पद्धतीने लढाया दिल्या पण स्वराज्य टिकवून ठेवले. औरंगजेबची कबर मराठ्यांच्या पराक्रमाची आणि स्वराज्याच्या लढ्याची प्रतीक आहे. ती कबर महाराष्ट्रात असणे म्हणजे इतिहासाचा तो एक मोठा साक्षीदार आहे. अशी कबर नष्ट करून शिवरायांचा इतिहासच पुसण्याचा कुटील डाव काही दुष्टमंडळी करू पाहत आहेत. हा बामणी कावा मराठ्यांनी ओळखला पाहिजे. आणि औरंगजेबच्या कबरीला कोणतीही हानी पोहोचली नसली पाहिजे. याची काळजी सर्वांनीच घेणे आवश्यक आहे. छत्रपती शिवरायांच्या, छत्रपती संभाजी राजे यांच्या आणि महाराणी ताराबाई यांच्या पराक्रमांची ती साक्षीदार आहे. औरंगजेब ला 26 वर्षे मुक्काम ठोकूनही स्वराज्य बुडवता आले नाही, याची ती साक्षीदार आहे. हा मराठ्यांचा धगधगता इतिहास जिवंत राहिलाच पाहिजे. त्यासाठी त्याची साक्षीदार म्हणून औरंगजेब ची कबर आहे महाराष्ट्रात जिवंत राहिलीच पाहिजे. औरंगजेबच्या कबरी वरून जे काही राजकारण चालू आहे ,ते केवळ मतांचे राजकारण आहे. त्यात शिवरायांच्या अस्मितेचा काडीचाही संबंध नाही .केवळ ढोंगीपणा आहे हे शिवप्रेमींनी समजून घेतले पाहिजे.