*मध्ययुगीन भारत :
*पांड्य:
• तमिळनाडूतील तिन्नेवेलीच्या प्रदेशात पांड्य सत्ता प्राचीन काळापासूनच अस्तित्वात होती.
• इसवी सनाच्या आठव्या शतकात अरिकेसरी मारवर्मा याने पांड्यसत्ता प्रबळ बनवली.
• नवव्या शतकात चोळ सत्तेचा उदय झाल्यानंतर पांड्य सत्तेला उन कळा लागली.
• पुढे सुंदर पांड्य याने चोळांचे ‘तंजावर’ हे ठिकाण जिंकून घेतले.
• चौदाव्या शतकात दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापन मलिक काफूर याने पांड्य सत्ता सुलतानाच्या वर्चस्वाखाली आणली.
• पांड्य सत्तेच्या काळात मंदिर स्थापत्य कलेत प्रगती झाली.
*पाल:
• आठव्या शतकात बंगालमध्ये पाल सत्तेचा उदय झाला.
• गोपाल हा पाल सत्तेचा संस्थापक होय.
• गोपालाचा पुत्र धर्मपाल याने मगधवर आपली सत्ता प्रस्थापित केली.
• राष्ट्रकूट व प्रतिहार सत्तांशी संघर्ष करुन त्यांच्यावर विजय संपादन केला.
• पाल राजे बौद्ध धर्माचे अनुयायी होते.
• त्यांनी विक्रमशीला, विहार या ठिकाणी विहार बांधले.
*राष्ट्रकूट:
• इसवी सनाच्या आठव्या शतकात दक्षिण भारतात राष्ट्रकूट सत्ता उदयास आली.
• इ. स. 792 मध्ये गादीवर आलेला तिसरा गोविंद या राजाच्या कारकिदांत राष्ट्रकूट सत्ता कनोजपासून रामेश्वरपर्यंत पसरली.
• तिसरा गोविंद याचा मुलगा अमोघवर्ष याने सोलापूरजवळ मालखेड हे नगर वसवले.
• राष्ट्रकूट घराण्यातील पराक्रमी राजा तिसरा कृष्ण याने चोळ राजांचे आक्रमण परतवून लावले. राष्ट्रकूट सत्ता उत्तर भारतात वाढवली.
• दहाव्या शतकात राष्ट्रकूट सत्तेला उतरती कळा लागली.
• चालुक्य राजा तैल याने राष्ट्रकूटांचा पराभव केला.
*चोळ:
• तमिळनाडूतील चोळ सत्ता ही मध्ययुगातील एक प्रबळ सत्ता होती.
• इ. स. विजयालय या चोळ राजाने 850 च्या सुमारास तंजावर जिंकले.
• विजयालयाचा नातू परांतक याने चोळांची सत्ता बलशाली केली. त्याने तीसाठी जलसिंचनाच्या योजना राबविल्या.
• इ. स. 985 मध्ये गादीवर आलेला पहिला राजराज या चोळ घराण्यातील महापराक्रमी राजाने पांड्य, चालुक्य सत्तांचा पराभव केला.
• पहिला राजराज याने प्रबळ सैन्य व प्रभावी नौदल यांच्या जोरावर उत्तर श्रीलंका व मालदीव ही बेटे जिंकून घेतली.
• राजराज याचा पुत्र राजेंद्र याने चालुक्यांचा अनेक वेळा पराभव केला.
• इ. स. 1310 मध्ये मलिक काफूर याने चोळांची सत्ता संपुष्टात आणली.
• या काळातील वास्तुकला व शिल्पकला प्रसिद्ध आहेत.
• या काळातील नटराजाच्या ब्राँझ मूर्ती प्रसिद्ध आहेत.
*गुर्जर प्रतिहार:
• इसवी सनाच्या आठव्या शतकाच्या पूर्वार्धात मध्य भारतात गुर्जर-प्रतिहार मतेचा उदय झाला.
• वत्सराज हा गुर्जर-प्रतिहारांचा एक महत्त्वाचा राजा होय.
• वत्सराजचा मुलगा नागभट याने आंध्र, कलिंग, विदर्भ, कनोज प्रदेशांवर सत्ता मिळवली.
• नागभटाचा नातू, भोज याच्या काळात प्रतिहाराची सत्ता कळसास पोहोचली.
• त्याने राष्ट्रकूट राजा दुसरा कृष्ण याचा पराभव करून गुजरातवर आपली सत्ता प्रस्थापित केली.
• इ. स. 915 च्या सुमारास राष्ट्रकूट राजा इंद्र याने गुर्जर प्रतिहारांचा पराभव केला. त्यानंतर या सत्तेस उतरती कळा लागली.
*राजपूत:
• इ. स. दहाव्या शतकात परमार, चंदेल्ल, चौहान या राजपूत राजसत्ता अस्तित्वात होत्या.
• इ. स. 1000 मध्ये परमार राजा भोज गादीवर आला.
• भोज राजाने परमार सत्ता वाढवली.
• रणथंबोर राजा हमीर, देवगिरीचा राजा रामदेवराय, दिल्लीचा सुलतान जलालुद्दीन खिलजी यांनी परमारांच्या राज्यावर स्वाऱ्या केल्या.
• इ. स. 1305 मध्ये अल्लाउद्दीनने माळवा जिंकला आणि पर सत्ता संपुष्टात आणली.
• इसवी सनाच्या दहाव्या शतकात चंदेलानी आपली स्वतंत्र सत्ता स्थापन केली.
• यशोवर्मा या राजाने चंदेल्ल सत्ता यमुनेपर्यंत वाढवली.
• गझनीच्या महमूदाने केलेल्या स्वाऱ्या चंदेल्ल राजा विद्याधर याने परतल्य लावल्या.
• तेराव्या शतकात कुतुबुद्दीन ऐबकने आणि चौदाव्या शतकात अल्लाउद खिलजीने चंदेल्लांचा बराचसा भाग जिंकून चंदेल्ल सत्ता संपुष्टात आणली.
• खजुराहो येथील प्रसिद्ध मंदिरे चंदेल्ल राजवटीत बांधली गेली.
• उत्तरेकडील प्रदेशात पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजा होऊन गेला.
• पृथ्वीराज चौहानने मंहमद घोरीचा तराईच्या युद्धात पराभव केला.
• इ. स. 1192 मध्ये झालेल्या दुसऱ्या तराईच्या युद्धात घोरीने पृथ्यो चौहानाचा पराभव करून चौहानांची सत्ता संपुष्टात आणली.
*यादव:
• नाशिक जिल्ह्यातील ‘चांदवड’ हे यादवांचे मुख्य ठिकाण होते.
• बाराव्या शतकात भिल्लम यादवाने स्वतंत्र राज्य स्थापन केले.
• भिल्लमने देवगिरी हे नवे शहर वसवले व यादवाची राजधानी तेथे स्थान केली.
• भिल्लमने चालुक्य, होयसळ आणि चोल यांचा पराभव केला.
• भिल्लमनंतर सिंघण, कृष्णदेव, रामदेव यासारखे कर्तबगार राजे देवगिरीच गादीवर आले.
• कृष्णा, मलप्रभा नद्यांमधील प्रदेश होयसळांकडून सिंघण यादवाने जिंकुन घेतला.
• माळव्याचे परमार, कोल्हापूरचे राजे इत्यादींना पराभूत करून सिंघणान वऱ्हाड, खानदेश, बीड, परभणी, कोल्हापूर, रत्नागिरी, उत्तर म्हैसूर इतका मोटा प्रदेश आपल्या राज्यास जोडला.
• सिंघणानंतरचा यादव राजा कृष्णदेव याचा सेनापती चामुंडराय याने का नदीपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला.
• तेराव्या शतकात अल्लाउद्दीन खिलजी याने देवगिरीवर स्वारी करून रामदेवराय राजाचा पराभव केला आणि यादवांनी सार्वभौमसताना केली.
• यादवांची सत्ता महाराष्ट्रभर पसरली होती,
• यादवांच्या काळात मराठी संस्कृती बहरू लागली होती.
• श्री चक्रधरस्वामी व संत ज्ञानेश्वर है थोर संत होऊन गेले,
• महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची पायाभरणी याच काळात झाली.
*होयसळ :
• इ. स. 1022 मध्ये नृपकाम याने होयसळांचे राज्य स्थापन केले.
• इ. स. 1110 मध्ये विष्णुवर्धन हा होयसळ राजा सत्तेवर आला. त्याने संपूर्ण कर्नाटक आपल्या अधिपत्याखाली आणले,
• तेराव्या शतकात 1310 साली मलिक काफूर याने होयसळ राजा वीर बल्लाळ याचा पराभव करून होयसळ सत्ता संपुष्टात आणली.