कोल्हापुरातील मुक्त सैनिक वसाहतीमधील ही घटना आहे. येथील इरा गार्डन रहिवासी संकुलातील शिवाजी पाटील मूळ गाव आरळे तालुका करवीर यांचा बंद बंगला फोडून चोरट्यांनी सहा तोळे दागिने व दोन लाख रुपयांची रोकड लंपास केली. त्यानंतर बंगल्यात चार ठिकाणी कपडे, कागदपत्रे, फर्निचरला आग लावून चोरट्यांनी पळ काढला. बंगल्यात चोरी करून आग लावण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे.त्यामुळे पोलिसांबरोबरच नागरिकांना आश्चर्य वाटले आहे.सगळ्यात महत्त्वाचे आणि धोकादायक म्हणजे कोल्हापूर शहरात चोरांचा अक्षरश: सुळसुळाट चालू आहे. पोलिसांनी चोरी प्रतिबंधक पथक स्थापन करून चोरांवर कडक कारवाई करावी,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.