भारत या देशात खूप मोठी प्राचीन ऐतिहासिक परंपरा आहे. भारताचा प्राचीन काळ हा वैभवशाली काळ आहे. त्या काळातच सप्तसिंधू प्रदेशात गौरवशाली परंपरा असलेले राजेरजवाडे होऊन गेले. बळी वंशातील हिरण्याक्ष, हिरण्यकश्यिपु विरोचन, प्रल्हाद, बळीराजा हे एकापेक्षा एक जनहिताय राजे होऊन गेले. बळीराजा हा त्यांतील सर्वोच्च शिरोमणी होता.
बळीवंशातील राजांची सत्ता सप्त सिंधु प्रदेशात सुरूवातीला होती; पण नंतरच्या काळात इंद्र, विष्णु यांच्या कपटनीती आक्रमणामुळे त्यांना हळूहळू दक्षिणेकडे आपले बस्तान बसवावे लागले. बळी वंशातील राजांनी राज्य कारभाराच्या सोयीसाठी राज्याचे छोटे छोटे खंड काढले होते. आणि त्या खंडांचा कारभार पाहण्यासाठी स्थानिक सरदार नेमले होते . जोतिबा, खंडोबा, महासुभा (म्हसोबा) हे यातीलच काही खंड आहेत.पुढे या खंडांचे प्रमुख राजे झाले. पुढे त्यांच्या सद्गुणी कारभारामुळे जनतेने त्यांना देवत्व बहाल केले. जेजुरीचा खंडोबा (Jejuri – Khandoba) हाही बळीवंश परंपरेतील सरदार राजा-देव आहे. लोक आजही भक्तिभावाने जेजुरीला जातात.त्या जेजुरीविषयी आपण अधिक माहिती घेऊया—-
जेजुरीची संक्षिप्त माहिती: Brief Information of Jejuri
ठिकाणाचे नाव: जेजुरी
ठिकाणाची प्रसिद्धी: खंडोबा
ठिकाणाचा प्रकार :धार्मिक, सांस्कृतिक
जिल्हा : पुणे
राज्य : महाराष्ट्र
पुण्याहून अंतर :49 किमी
कसे जायचे जेजुरीला: How to reach Jejuri?
1. जेजुरी पुणे जिल्ह्यात आहे. पुण्याहून जेजुरीला रेल्वेने, बसने जाता येते. पुणे ते जेजुरी अंतर 49 किलोमीटर आहे. पुण्याहून रेल्वेने जाताना रेल्वे दोन-तीन ठिकाणी बोगद्यातून जाते. त्यावेळी रेल्वेत अंधार पडतो. अशा वेळी काही टवाळकी लोक उपद्रव करतात. त्यापेक्षा बसने जाणे सोयीचे आणि सुरक्षित असते.
2. सासवड येथे सोपानदेवाची समाधी आहे. सासवडहून जेजुरी 17 किलोमीटर अंतरावर आहे. येथून बसने किंवा आपल्या खासगी वाहनाने जाता येते.
3.बारामतीहून जेजुरीला जाता येते. बारामती ते जेजुरी अंतर 55 किलोमीटर आहे .येथून बसने जेजूरीला जाता येते.
4. पुरंदरचा किल्ला पाहून जेजुरीला जाता येते. पुरंदर ते जेजुरी अंतर 47 किलोमीटर आहे.
जेजुरी कशासाठी प्रसिद्ध आहे? What is Jejuri Famous for?
जेजुरी हे खंडोबा देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. जेजुरी पुरंदर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील एक सांस्कृतिक प्राचीन मंदिर आहे . पुरंदर या तालुक्याच्या ठिकाणापासून जेजुरी 47 किलोमीटर आहे. तर पुणे या जिल्ह्याच्या ठिकाणापासून जेजुरी 50 किलोमीटर आहे. जेजुरी गड चढण्यासाठी सुमारे 500 पायऱ्या चढाव्या लागतात.
जेजुरीचा खंडोबा कोण आहे ? Who is Khandoba of Jejuri?
जेजुरीच्या खंडोबा बद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत .आद्य शंकराचार्याने जेव्हा बुद्धाचे अस्तित्व पुसण्यासाठी मोहीम हाती घेतली. तेव्हा अनेक बुद्ध मंदिरांचे ब्राह्मणीकरण केले.
त्यांची नावे बदलली आणि आपण त्यावर कब्जा केला. काही बौद्ध अनुयायांनी बुद्धांचे विचार टिकावेत म्हणून बुद्धाची मंदिरे वेगळ्या रुपात वसवली. जसे पंढरपूरचा विठोबा.
तसेच खंडोबाचेही नामकरण झाले असावे असे काहींना वाटते. बळी वंशाच्या परंपरेनुसार खंडोबा हा सरदार होता. पुढे तो राजा झाला. विशिष्ट खंडाचा कारभार तो स्वतः करु लागला.
जेजुरीचे खंडोबा मंदिर Khandoba Temple of Jejuri.
जेजुरी गावच्या एका छोट्याशा टेकडीवर हा जेजुरी गड आहे. या गडावरच खंडोबा मंदिर आहे. पूर्वी याच ठिकाणी खंडोबाचा वाडा असेल कदाचित आणि या वाड्यातूनच राज्य कारभार पाहिला आत असे. याच ठिकाणी आता मंदिर आहे. खंडोबाचे मंदिर पूर्णतः दगडी असून मंदिर मजबूत स्थितीत आहे. मंदिराच्या समोर दीपमाळ आहे. उत्सवाच्या वेळी हे दीपमाळ प्रज्वलित केलेले असतात.
मंदिराची रचना हेमाडपंती असून एक हजार वर्षापूर्वी हेमाडपंथी बांधकामाचा जन्म झाल्यामुळे मंदिराचे बांधकाम 1000 वर्षांच्या आसपासच आहे. मंदिराच्या गुर्भगृहात खंडोबाची मूर्ती आहे. खंडोबाला मल्हार, मल्हारी मार्तंड असेही मानले जाते .खंडोबा हे शिवाचे रूप आहे .असेही मानणारा वर्ग आहे.
खेडोबा हा महाराष्ट्रातील अनेक लोकांचा कुलदैवत आहे. महाराष्ट्रातील अनेक लोक खंडोबाच्या दर्शनाला येतात. लग्न झाल्यानंतर अनेक नवविवाहित खंडोबाच्या दर्शनाला येतात.
खंडोबाच्या बायका: Khandoba’s Wives
खंडोबा हा राजा होता. त्याच्या दोन बायका होत्या. एक म्हाळसा आणि दुसरी बाणूबाई. म्हाळसा ही खंडोबाची पट्टराणी होती. म्हाळसाला खंडोबाने दुसरे लग्न केलेले आवडलेले नव्हते. त्यामुळे तिने बाणूबाईला गडावर येण्यास मज्जाव केला होता. खंडोबाने बाणूबाईसाठी गडाखालीच वाडा बांधून दिला होता . बाणूबाई तेथेच राहत होती. खंडोबा बाणूबाईला भेटण्यासाठी गडाखाली जात होता.
वाघ्या-मुरळी–अनिष्ट प्रथा:Wagya Marali-unurated tradition
लग्न आल्यानंतर मूल होत नसेल तर लोक खंडोबाला नवस बोलत होते. नवस बोलल्यानंतर मुलगा झाला तर त्याला खंडोबाला अर्पण करायची प्रथा आहे. यालाच वाघ्या असे म्हणतात. मुलगी झाली, तर तिचा खंडोबाशी विवाह लावून तिलाही मुरळी म्हणून खंडोबाला सोडली जाते.आजही खंडोबाच्या पायऱ्या चढताना वाघ्या- मुरळी गाणे म्हणत असतात. हे विदारक दृश्य पाहून मन हेलावते. असल्या अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी प्रबोधन करणे आवश्यक आहेच. शिवाय अशा प्रथांना कायद्याने बंदी बालणे आवश्यक आहे.
भंडाऱ्याची अनावश्यक उधळण :
खंडोबा देवालय परिसरात उत्सवाच्या वेळी आणि दर रविवारी भंडाऱ्याची अनावश्यक उधळण केली जाते. आपले प्रेम, भक्ती भंडारा उधळूण करण्याची आवश्यकता आहे काय ? या प्रथेला भक्तांनीच समजूतदारपणा घेतला पाहिजे. भंडाऱ्याच्या उधळणीमुळे वातावरण दूषित होतेच , त्याच बरोबर डोळे आणि त्वचा यांना हा भंडारा घातक असतो. भंडारा हा केमिकल मिश्रित असतो. त्याचा आपल्या शरीरावर विपरित परिणाम होतो.