शिवाजी विद्यापीठ नामविस्तार आणि राजकारण
महाराष्ट्रातील एक नामांकित विद्यापीठ म्हणून शिवाजी विद्यापीठाची ओळख आहे. हे विद्यापीठ 18 नोव्हेंबर 1962 रोजी स्थापन झाले. तत्कालीन लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रयत्नातून कोल्हापुरात सुमारे 853 एकरात शिवाजी विद्यापीठ स्थापन झाले आहे. महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी हे विद्यापीठ पूर्णत्वास येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी छत्रपती शिवरायांच्या नावाने या विद्यापीठाला शिवाजी विद्यापीठ असे नाव देण्यात पुढाकार घेतला होता. छत्रपती शिवरायांचे आणि कोल्हापुराचे खूप ऋणानुबंध आहेत. छत्रपती शिवरायांच्या नावाची या निमित्ताने कायमची स्मृती राहावी आणि त्यांच्या इतिहासाला नेहमीच उजाळा मिळत राहावा, या उद्देशाने शिवाजी विद्यापीठ असे या विद्यापीठाचे नामकरण करण्यात आले.
2019 साली महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची नियुक्ती झाली. त्यावेळी महाराष्ट्रात आघाडीचे सरकार होते. उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री असतानाच काही हिंदुत्ववादी संघटनांनी शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तार करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार शिवाजी विद्यापीठाला छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ किंवा छत्रपती शिवाजी विद्यापीठ असे नामकरण करावे या मागणीचा जोर वाढला होता.
कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर खरेखुरी निष्ठा असणाऱ्या माणसांनी या नवीन नामविस्ताराला जोरदार विरोध केला. हा विरोध करण्यात तत्कालीन कॉम्रेड नेते एन डी पाटील इतिहास जयसिंगराव पवार आणि इतर मंडळींनी नवीन नामविस्ताराला विरोध केला. शिवाजी हा शब्द आमच्या अस्मितेचा आहे. त्याचा कोणीही अवमान करू नये. नवीन नामांतर झाल्यास म्हणजेच छत्रपती शिवाजी विद्यापीठ असे नामांतर झाल्यास पुढील पिढी या विद्यापीठाचा उच्चार जसे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ या विद्यापीठाचा उच्चार जे एन यु असा करतात तसाच शिवाजी विद्यापीठाचा उच्चार सी एस यु असा करतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मागे पडेल म्हणून एन डी पाटील, जयसिंगराव पवार यासारख्या नेत्यांनी कडाडून विरोध केला . तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका नमती घेऊन नवीन नामविस्ताराचा विषय बाजूला ठेवला.
2014 पासून भारतात जाती धर्माचे मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण होत आहे .भारतात प्रथमच धर्मांधता वाढत चालली आहे. मुघल, इस्लाम, इंग्रज काळात जेवढी धर्मांधता नव्हती , त्यापेक्षा आता कितीतरी पटीने गेल्या दहा वर्षात वाढलेली आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात हिंदुत्ववादी संघटनांना बळ आले आहे. या हिंदुत्ववादी संघटनांनी शिवाजी विद्यापीठाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे करण्यासंदर्भात आंदोलन सुरू केले आहे.
हिंदुत्ववादी संघटनांच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील पुरोगामी विचारांचा वारसा असलेले अनेक कार्यकर्ते यांची मिटींग शुक्रवार दिनांक 14 मार्च 2025 रोजी कोल्हापुरात झाली . या मीटिंगमध्ये इतिहासकार जयसिंगराव पवार यांनी शिवाजी विद्यापीठाला शिवाजी विद्यापीठ हेच नाव कसे योग्य आहे , याबाबत मार्गदर्शन केले आणि शिवाजी हा शब्द आमच्या किती अस्मितेचा आहे हे लोकांना पटवून दिले.
*नामविस्तार केल्यास ठोकून काढू*
केवळ मतांच्या राजकारणासाठी कोल्हापुरातील काही आमदारांनी शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराला पाठिंबा दिला आहे. पण नामविस्तार केल्यास त्यांना आम्ही ठोकून काढू.असा कोल्हापुरातील शिवप्रेमींनी गर्भित इशारा दिला आहे. या शिवप्रेमी विचारांच्या कार्यकर्त्यांना इतिहासकार जयसिंगराव पवार यांनी मार्गदर्शन केले. इतिहासकार जयसिंगराव पवार स्वतः रिंगणात उतरून या नामविस्ताराला विरोध करत आहेत हे हिंदुत्ववादी संघटनाने एकदा समजून घ्यावे ,म्हणजे त्यांना शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समजेल.
*कोरटकर सोलापूरकर यांनी छत्रपती शिवरायांचा अवमान केला तेव्हा कुठे गेला होता?
राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांनी शिवाजी महाराजांचा अवमान केला. त्यावेळी हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदुत्ववादी आमदार कुठे लपून बसले होते? ते का मैदानात उतरले नाहीत? मग तुमचे छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम आहे की नाही हे कसे ओळखायचे ? शिवरायांचा अपमान केला तेव्हा खऱ्या खुऱ्या शिवप्रेमींच्या तळपायाची आग मस्तकाला गेली; पण तुम्ही मात्र बिळात लपून बसला. म्हणूनच नाम विस्ताराच्या टिमक्या या पोकळ शिवप्रेमींनी आमच्या पुढे वाजवू नयेत. असे ठणकावून कोल्हापुरातील खऱ्याखुऱ्या शिवप्रेमींनी सांगितले आहे. नामविस्तार न होण्यातच शिवरायांचा मोठेपणा आणि शिवरायांची अस्मिता आहे हे सर्वांनीच ध्यानात घ्यावे.