*Ancient India Ancient kingdoms of Southern प्राचीन भारत :दक्षिणेकडील प्राचीन राज्ये :
सातवाहन, वाकाटक, चालुक्य, पल्लव या घराण्यांची कारकिर्द भारताच्या इतिहासात महत्त्वाची आहे.
*Satvahan सातवाहन :
• इसवी सन पूर्व पहिल्या शतकात सातवाहन सत्तेचा उदय झाला.
• महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या प्रदेशांत त्यांचे राज्य होते.
• महाराष्ट्रातील ‘प्रतिष्ठान’ म्हणजे ‘पैठण’ ही सातवाहन सत्तेची राजधानी होती.
० सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध होती.
० त्याच्या पराक्रमाबद्दल ‘त्रिसमुद्रतोयषी वाहन’ म्हणजे ‘ज्याचे घोडे समुद्राचे पाणी प्यायले आहेत’ असा राजा होय. (बंगालचा उपसागर, अरबी सम हिंदी महासागर.
• सातवाहन काळात जुन्नर ‘नाणेघाट’ हा व्यापारीदृष्टीने महत्त्वाचा होता तेथील एका गुहेत नागनिका या सातवाहन राणीचा लेख भिंतीवर कोरलेला आहे.
• पैठण, तेर, भोकरदन येथील बाजारपेठेतून रोमच्या बाजारपेठेत माल जात होता.
• सातवाहन काळात अजिंठा, जुन्नर, नाशिक, कार्ले, कान्हेरी येशी लेण्यांची निर्मिती झाली.
• सातवाहन काळातच गाथासप्तमी हा महाराष्ट्रीय प्राकृत भाषेतील काव्यग्रंथ रचण्यात आला. ‘हाल’ हा सातवाहन राजा त्याचा कर्ता होता, असे मानले जाते.
*Vakatak वाकाटक:
• इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात विदर्भात उदयाला आलेल्या वाकाटक घराण्याची स्थापना ‘विंध्यशक्ती’ या राजाने केली.
• पहिला प्रवरसेन हा वाकाटक राजा सर्वांत प्रसिद्ध होता.
• त्याने वाकाटकांचे राज्य उत्तरेस नर्मदेपर्यंत दक्षिणेस कोल्हापूरपर्यंत वाढवले.
• हरिषेण हा वाकाटकांचा शेवटचा राजा होय.
• हरिषेणाचा मंत्री वराहदेव हा बौद्ध धर्माचा अनुयायी होता.
• वराहदेवने अजिंठा येथील 16 क्रमांकाचे लेणे खोदवून घेतले.
• वाकाटकांच्या काळात ‘माहाराष्ट्री’ या प्राकृत भाषेत विपुल लेखन झाले.
• संस्कृत वाङ्मयाचा विकास याच काळात झाला.
• प्रसिद्ध संस्कृत कवी कालिदास याने मेघदूत हे संस्कृत काव्य याच काळात लिहिले असावे.
*Chalukya चालुक्य:
• इसवी सनाच्या सहाव्या शतकात पहिला पुलकेशी याने चालुक्य घराण्याची सत्ता स्थापन केली.
० आजच्या कर्नाटक राज्यात ‘बदामी’ येथे चालुक्य घराण्याची राजधानी होती. म्हणून त्यांना ‘बदामीचे चालुक्य’ असे म्हणत.
० चालुक्य राजा दूसरा पुलकेशी याने सम्राट हर्षवर्धनचे आक्रमण परतवून लाकले होते. चालुक्यांच्या काळात बदामी, ऐहोळे प्रसिद्ध आहेत.
० याच काळात कन्नड व संस्कृत भाषेत विपुल साहित्य निर्माण झाले,
० पूज्यपाद, सामंतभद्र हे प्रसिद्ध कन्नड कवी चालुक्य काळात निर्माण झाले.
*Pallav पल्लव:
• इसवी सनाच्या सहाव्या शतकात चालुक्याच्या सत्तेबरोबरच पल्लवांची सत्ता प्रबळ झाली.
• ‘कांची’ ही पल्लवांची राजधानी होती.
• ‘महेंद्रवर्मा’ हा पल्लवराजा कर्तबगार आणि विद्वान होता. त्याने संगीतावर ग्रंथ लिहिला. त्याने चित्रकला, शिल्पकला या कलांना प्रोत्साहन दिले.
• महेंद्रवर्माचा मुलगा नरसिंह वर्मा हा पराक्रमी होता.
• चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचा त्याने पराभव केला होता.
• नरसिंहवर्माच्या काळात चिनी प्रवासी ‘युआन श्वांग’ याने कांचीला भेट दिली होती.
• प्रसिद्ध संस्कृत कवी ‘भारवी’ ही पल्लवांची दरबारी होती.
• नरसिंहवर्माच्या काळात महाबलिपुरम येथे रथमंदिरे तयार झाली.
• पल्लवांचे आरमार प्रबळ व सुसज्ज होते.
• पल्लव राजे शैव वैष्णव पंथांचे आश्रयदाते होते.
• त्यांच्या काळात ‘सर्व धर्माच्या लोकांना सहिष्णुतेने व न्यायाने वागवले जाई’ असे चिनी प्रवासी ‘युआन श्वांग’ याने म्हटले आहे.
*संघम (संगम) साहित्य:
• दक्षिण भारतात, ‘संघम’ नावाच्या वेगवेगळ्या कालखंडात विद्वान लेखकांच्या बैठका झाल्या आहेत.
• विद्वानांकडून जी साहित्य निर्मिती झाली त्याला ‘संघम साहित्य’ असे म्हणत.
संगम साहित्यातील सिलप्पधिरम व मणिमेखलाई ही दोन महाकाव्य प्रसिद्ध आहेत.