Pahalgam massacre-पहलगाम हत्याकांड.. इट का जवाब पत्थर से..?पहलगाम हत्याकांड का आणि कसे झाले? भारतात काय प्रतिक्रिया उमटल्या? जाणून घेऊया सविस्तर माहिती.

भारताचा स्वर्ग असलेले ठिकाण म्हणजे जम्मू-काश्मीर. या ठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक येतात. पहलगाम या जम्मू काश्मीर येथील निसर्ग रम्य ठिकाणी 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवाद्यांनी हल्ला करून 26 निरपराध पर्यटकांना ठार मारले.

काश्मीर– एक निसर्गरम्य ठिकाण: Kashmir – a place of scenic beauty

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. आणि याच वर्षी पाकिस्तानने काश्मीर राज्यावर पहिला हल्ला केला. खरंतर ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला, त्यावेळी काश्मीर राज्य हे भारतात नव्हतेच. तत्कालीन काश्मीरचा राजा हरिसिंह याच्या आटोक्यात हा हल्ला येईना, त्यामुळे त्याने भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे मदतीची याचना केली. नेहरूंनी आपली मुत्सेद्दीगिरी दाखवून काश्मीर भारतात विलीन करत असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. असा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर राजा हरी सिंह आणि भारत सरकार यांच्यात एक करार झाला. त्या करारानुसार काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग बनला. भारत सरकारने राजा हरिसिंह सर्वतोपरी मदत केली. पाकिस्तानचा या लढाईत पराभव झाला. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग बनला. तेव्हापासून काश्मीर धगधगता आहे. भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर थांबले आणि जैसे थे स्थिती निर्माण झाली. त्यावेळी काश्मीरचा काही भाग पाकिस्तानच्या ताब्यात राहिला. तो आजही पाक व्याप्त काश्मीर (POK) या नावाने ओळखला जातो.

पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर मदत: International aid to Pakistan

1947 रोजी भारत स्वतंत्र झाला त्यावेळी इंग्रजांनी भेदनीतीचा अवलंब करून भारताचे द्विभाजन केले. भारत आणि पाकिस्तान हे स्वतंत्र देश नवीन उदयाला आले. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला अमेरिकेसारख्या देशांकडून मदत मिळत गेली आणि पाकिस्तान कुरापती करत राहिला. भारत आणि रशिया यांचे मजबूत संबंध अमेरिकेला खूपत होते . म्हणूनच त्यांनी पाकिस्तानला मदत करण्याचा जणू विडा उचलला होता.

पाकिस्तानची वारंवार कुरापत :Pakistan’s repeated insults

भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तान हा देश परकीयांचे बाहुले झाले. तो देश सतत भारताची कुरापत करू लागला. भारतात दहशतवाद माजवणे, स्वतंत्र खलिस्तानला पाठिंबा देणे, हिंदू मुस्लिम अशी द्वेषभावना भारतात पसरवणे, काश्मीर खोरे सतत अशांत ठेवणे हे पाकिस्तानचे जणू ध्येयच बनले. या उपद्व्यापात पाकिस्तानने स्वतःचे खूप मोठे नुकसान करून घेतले.

22 एप्रिल 2025 चा हल्ला: Attack on April 22, 2025

22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम या निसर्गरम्य ठिकाणावर सुमारे 2000 हून अधिक पर्यटक असलेल्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने दहशतवाद्यांनी अचानक हल्ला करून बेछुटपणे गोळीबार केला. इतकेच नाही तर अगदी शांत डोक्याने तुम्ही हिंदू की मुस्लिम? असे प्रश्न विचारून त्यांच्यावर गोळीबार केला. अर्थात या हल्ल्यात केवळ हिंदूच नाही तर मुस्लिम ,ख्रिश्चन, जैन अशा अनेक धर्मांचे लोक मृत्युमुखी पडले. म्हणजेच हा हल्ला धर्मावर होता की भारतावर? याचे उत्तर निश्चितच भारतावर असे येईल.

*दहशतवाद्यांनी हिंदू कौन कौन है असे का विचारले असेल? Who are the Hindus? Why did the terrorists ask?*

पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन आलेल्या दहशतवाद्यांनी अगदी टेहळणी करून हा हल्ला केलेला आहे. कारण ज्या दिवशी हा हल्ला झाला, त्या दिवशी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नव्हती. त्यामुळे दहशतवाद्यांना हिंदू कौन है ? असा प्रश्न विचारायला वेळ मिळाला. मग अशा प्रश्न का बरं विचारला असेल? या पाठीमागे पाकिस्तानचा काय हेतू आहे? त्याच्या मुळाशी जायला नको का?

भारतात सध्या भारत हा देश हिंदुराष्ट्र बनवण्याचा आरएसएस सारख्या संघटनेची आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांची अगदी उघड उघड भूमिका राहिली आहे. त्यामुळे भारतातील मुस्लिमांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होणे साहजिकच आहे. या वातावरणाचा गैरफायदा घेऊन भारतात असंतोष पसरवणे आणि भारत अशांत करणे त्याचबरोबर भारताला अंतर्गत कलहातून डबघाईला आणणे हा पाकिस्तानचा हेतू 22 एप्रिल 2025 च्या हल्ल्यातून दिसून येत आहे. अशा प्रकारे प्रश्न विचारल्यामुळे आपली बातमी संपूर्ण भारतभर व्हायरल होईल आणि त्याचा परिणाम म्हणून भारतात असंतोष पसरेल. असे पाकिस्तानला वाटत होते पण ते साफ चुकीचे ठरले. भारतीय नागरिकांनी एकीचे संदेश देत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. पहलगाम येथे हल्ला झाल्यानंतर तेथील स्थानिक मुस्लिमांनी पर्यटकांना वाचवण्यात मोठी आघाडी घेतली होती . एवढेच नाही तर अनेक स्थानिक मुस्लिम नागरिकांनी दहशतवाद्यांना तोंड दिले. सय्यद आदिल हुसेन शाह याने तर पर्यटकांना वाचवण्यासाठी छातीची ढाल केली. स्वतः शहीद झाला; पण मागे हटला नाही. अनेक मुस्लिम बांधवांनी पर्यटकांना मदत केल्याचे वृत्त खुद्द जखमी पर्यटकांनी आणि मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी दिले असल्यामुळे काश्मिरी मुस्लिम बांधवांच्या बद्दल संपूर्ण भारतात आग्रहाची भावना निर्माण झाली. इतकेच नाही तर काश्मीरमधील हिंदू आणि मुस्लिम नागरिकांनी मोर्चा काढून हिंदू मुस्लिम भाई भाई अशा घोषणा दिल्या आणि पाकिस्तानला चोख उत्तर दिले.

भारतीय हिंदू-मुस्लीमांचा संयम :Restraint of Indian Muslims

22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 26 लोकांचा मृत्यू झाला. यात हिंदू मुस्लिम ख्रिश्चन जैन नागरिक होते. दहशतवाद्यांनी हिंदू कौन है असा प्रश्न विचारल्यामुळे त्याचे पडसाद संपूर्ण भारतभर पसरले. पण भारतातील कोणत्याही हिंदू किंवा मुस्लिम संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला नाही ही सर्वात जमेची बाजू झाली. भारतातील काही अंधभक्त यांचे हिंदू मुस्लिम द्वेष पसरवणारे स्टेटस सोडले व्हाट्सअप वरचे मेसेज सोडले तर संपूर्ण भारत हा शांतच राहिला.

दुश्मन के जाल में मत फसें–ओवेसी यांचा शांततेचा संदेश :Don’t fall into the enemy’s trap..Owaisi’s message of peace

ए आय एम आय एम पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी संपूर्ण मुस्लिम बांधवांना आवाहन केले की शत्रूच्या जाळ्यात अडकू नका. शत्रूच्या कोणत्याही चितावणीला बळी पडू नका. भारतातील कोणत्याही मुस्लिमांनी द्वेष पसरवणारी पोस्ट किंवा स्टेटस ठेवले नाही . हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. हिंदू आणि मुस्लिम यांच्यात जर विद्रोह निर्माण झाला तर संपूर्ण भारताचे यात खूप मोठे नुकसान आहे हे सरकारने आणि संपूर्ण भारतीयांनी लक्षात ठेवले पाहिजे.

भारत सरकारचेही चोख उत्तर

भारत सरकारनेही ठोस पावले उचलली आहेत.1960 साली भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी कराची येथे जाऊन पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांच्या बरोबर सिंधू जलवाटप करार केला. या करारानुसार सिंधू नदीचे भारताला 20% पाणी मिळेल आणि पाकिस्तानला 80 टक्के पाणी मिळेल अशी तरतूद करण्यात आली. हा करार भारत सरकारने प्रथमच स्थगित केला. अर्थात यामुळे पाकिस्तान वर लगेच काही जलसंकट येणार नसले तरी भविष्यात त्यांना या संकटाला सामोरे जावे लागणार. याशिवाय भारताने पाकिस्तानी उच्चायुक्तातील लष्करी अधिकाऱ्यांना देश सोडून जाण्यास सांगितले. पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तातील लष्करी अधिकाऱ्यांना भारतात परत बोलावले आहे. पाकिस्तानची असलेला व्यापार करार भारताने सध्या बंद केला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तान सध्या तरी हबकले आहे.

भाजपचे राजकीय भांडवल BJP’s political capital

पाकिस्तानने घडवून आणलेल्या हत्याकांडामुळे भारतात असंतोष पसरला आहे. अर्थात दहशतवाद्यांनी हिंदू कौन है असे प्रश्न विचारल्यामुळे भाजपच्या हातात आहे ते कोलीत मिळाले आहे. या पक्षाने त्याचे भांडवल करून त्याचा फायदा बिहारच्या निवडणुकीत करून घेण्याचा जणू जंग बांधलेला आहे .असे भाजपच्या नेत्यांच्या बोलण्यावरून वाटते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार मधूनच पाकिस्तानला आणि जगाला संदेश दिला आहे. याचा पहिला हेतू हा की आपली भूमिका संपूर्ण जगाला कळावी आणि दुसरा हेतू म्हणजे बिहारच्या निवडणुकीत आपल्याला या संधीचा फायदा मिळावा.

*काश्मिरी जनतेने केलेल्या मदतीचे फळ The help given by the Kashmiri people has borne fruit.

22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जे लोक बळी पडलेत त्यांच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी काश्मिरी लोक धावून आले. यात बहुतांश काश्मीरमधील मुस्लिम लोकच होते. काश्मिरी लोकांनी निभावलेल्या उत्तम भूमिकेमुळे संपूर्ण भारतामध्ये काश्मिरी मुस्लिमांबद्दल एक प्रकारची सहानुभूती निर्माण झाली आणि त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण भारतात शांतता पसरण्यास मदत झाली.

*विरोधी पक्षाची ही सरकारला सहकार्य करण्याची भूमिका The role of the opposition party in supporting the government*

भारत सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सरकारच्या वतीने चूक झाल्याचे सरळ सरळ कबूल केले. विरोधी पक्षाने भारत सरकारला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. भारतातील दहशतवाद उपटून काढण्यास सरकारने उचललेल्या कोणत्याही पावलाला विरोधकांचा पाठिंबा असेल अशी विरोधी पक्षाने भूमिका घेतली.

Leave a comment