Operation Sindoor-ऑपरेशन सिंदूर

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने बुधवार दिनांक 7 मे 2025 रोजी मध्यरात्री नंतर 1:05 नंतर 1:30 वाजेपर्यंत पाक व्याप्त काश्मीर(POK) मध्ये नऊ ठिकाणी बॉम्ब वर्षाव करून अतिरेक्यांचे नऊ अड्डे उध्वस्त केले. या हल्ल्याला भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले.

22 एप्रिल 2025 मध्ये काश्मीर मधील पहलगाम या निसर्गरम्य ठिकाणी 26 पर्यटकांवर बेचुटपणे गोळ्या झाडून अतिरेक्यांनी त्यांना ठार मारले होते. त्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने ही मोठी कारवाई केलेली आहे.

ऑपरेशन सिंधूर- Operation Sindhoor

22 एप्रिल 2025 मध्ये झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात अतिरेक्यांनी पुरुषांनाच ठार मारले. स्त्रियांना अजिबात धक्का लावला नाही. या हल्ल्यात अतिरेक्यांनी अनेक महिलांचे सिंदूर पुसले होते. म्हणूनच भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर असे नाव देऊन पाकव्याप्त काश्मीर मध्ये उध्वस्त करून टाकला छपराक दिली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर गेले पंधरा दिवस भारत आणि पाक यांच्यात तणावाचे वातावरण आहे. भारत आणि पाक यांच्यात कोणत्याही स्वरूपात युद्ध सुरू होईल असे अनेक तज्ज्ञांचा अंदाज आहे. पण भारत सरकारला युद्धाची व्याप्ती न वाढवता अतिरेक्यांचा खात्मा करायचा आहे. म्हणूनच या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव दिलेले आहे.

भारताला संपूर्ण जगाचा पाठिंबा

चीन वगळता संपूर्ण जगाकडून भारताला पाठिंबा मिळत आहे. दहशतवाद मोडीत काढा. असा संदेश संपूर्ण जगाने दिला आहे. रशियानेही भारताला उघड पाठिंबा दिला आहे. तर अमेरिकेने सावध पवित्रा घेऊन युद्ध नको पण अतिरेक्यांना खत्म करा असा संदेश दिला आहे.

संपूर्ण भारतीयांचा भारत सरकारला आणि भारतीय लष्कराला पाठिंबा

संपूर्ण भारतीयांनी एकदाच काय ते होऊ दे अशी भूमिका घेतली आहे. भारतीय राजकीय पक्षांनी भारत सरकारला अतिरेक्यांचा बिमोड करण्यासाठी पाठिंबा दिला आहे. हे जरी खरे असले तरी दुर्गामी परिणाम होतील असे युद्ध भारतालाही नको आहे. भारतीय विचारवंतांचेही तेच मत आहे. भारत हा देश शांतताप्रिय असून भारतीय रक्तात युद्धखोरी नसली तरी स्वतःचे रक्षण करण्याची पूर्ण क्षमता भारतीय लष्कराकडे आहे. म्हणूनच भारत सरकारने सध्या तरी पाक आणि भारत तणावातून कोणत्याही स्वरूपाचे मोठे युद्ध होऊ नये म्हणून ऑपरेशन सिंदूर ही कारवाई केली आहे. अर्थात पाकिस्तानने आतताईपणा केल्यास भारतीय लष्कर मागे हटणार नाही. आणि युद्ध झालेच तर पाकिस्तानला याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. म्हणून पाकिस्तानने संपूर्ण शरणागती पत्करून येथून पुढे कोणत्याही प्रकारे दहशतवाद्यांना पाकिस्तान सरकार साथ देणार नाही, अशा प्रकारचा करार जर पाकिस्तानने केला तर त्यात पाकिस्तानचेच हित आहे.

पाकिस्तानला चीनचा पाठिंबा

सध्या पाकिस्तानला अन्य कोणत्याही देशांनी पाठिंबा दिला नसला तरी भारताचा पारंपारिक शत्रू चीन या देशाने पाकिस्तानला अंतर्गत पाठिंबा दिला आहे. भारत आणि पाक यांच्यात युद्ध झालेच तर चीनचा कल हा पाकिस्तानला मदत करणे हा असेल. आणि अशा प्रकारे पाकिस्तानने जर चीनची मदत घेतली तर पाकिस्तान हा देश पुन्हा दिवाळखोरीत जाईल आणि श्रीलंका या देशाचे जे हाल होत आहे त्याहीपेक्षा बिकट परिस्थिती पाकिस्तानवर येऊ शकते. चीन हा देश काही फुकट मदत करणारा नाही. या बदल्यात तो देश पाकिस्तानचे नक्कीच शोषण करणार. त्यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा अडचणीत येणार. युद्ध झालेच तर चीन पाकिस्तानला मदत करेल आणि रशिया भारताला मदत करेल. या घडामोडीमुळे आशिया खंडात वातावरण नक्कीच तणावपूर्ण असेल. असे वातावरण सर्वच देशांच्या हिताचे नसेल. त्यामुळे भारत सरकार जास्तीत जास्त युद्ध टाळेल पण अतिरेक्यांना गय करणार नाही. अशा प्रकारच्या आणखी एक दोन कारवाया नजीकच्या काळात भारत सरकार करण्याची शक्यता आहे. नजीकच्या काळात पाक व्याप्त काश्मीर मध्ये भारत सरकार हल्ला करून अतिरेक्यांचे पूर्ण अध्याय उध्वस्त करेल अशी आशा आहे.

Leave a comment